शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग: नव्या वर्षात कळंबपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:55 IST

पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट : प्रकल्पाच्या कामाला वेग

वर्धा : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जानेवारी २०२४ पर्यंत वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे. दरम्यान या मार्गाच्या विकासकामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला आहे.

वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली होती. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटरचा आहे. एकूण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा असून साडेतीन हजार कोटी खर्चातून तो पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर /नोंव्हेबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे.

विजय दर्डा यांच्या निरंतर प्रयत्नांचे यश

विदर्भ व मराठवाडा या महाराष्ट्रातील दोन मागास भागांसाठी संजीवनी ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' राहिला आहे. या प्रकल्पासाठी ते गेल्या तीन दशकांपासून निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २००८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली गेली. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. खासदारपदी असताना त्यांनी संसदेत या प्रकल्पाची मागणी लावून धरली, शिवाय केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी दर्डा यांनी या प्रकल्पाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच न त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. यानंतर विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी च वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मालधक्कादेखील मंजूर

या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवासदेखील भविष्यात रेल्वेद्वारे तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेडसह इतर रेल्वे मार्गाला १६ हजार कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धाYavatmalयवतमाळNandedनांदेड