शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग: नव्या वर्षात कळंबपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:55 IST

पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट : प्रकल्पाच्या कामाला वेग

वर्धा : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जानेवारी २०२४ पर्यंत वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे. दरम्यान या मार्गाच्या विकासकामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला आहे.

वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली होती. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटरचा आहे. एकूण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा असून साडेतीन हजार कोटी खर्चातून तो पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर /नोंव्हेबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे.

विजय दर्डा यांच्या निरंतर प्रयत्नांचे यश

विदर्भ व मराठवाडा या महाराष्ट्रातील दोन मागास भागांसाठी संजीवनी ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' राहिला आहे. या प्रकल्पासाठी ते गेल्या तीन दशकांपासून निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २००८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली गेली. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. खासदारपदी असताना त्यांनी संसदेत या प्रकल्पाची मागणी लावून धरली, शिवाय केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी दर्डा यांनी या प्रकल्पाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच न त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. यानंतर विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी च वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मालधक्कादेखील मंजूर

या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवासदेखील भविष्यात रेल्वेद्वारे तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेडसह इतर रेल्वे मार्गाला १६ हजार कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धाYavatmalयवतमाळNandedनांदेड