शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग: नव्या वर्षात कळंबपर्यंत धावणार रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:55 IST

पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट : प्रकल्पाच्या कामाला वेग

वर्धा : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जानेवारी २०२४ पर्यंत वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे. दरम्यान या मार्गाच्या विकासकामाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला आहे.

वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली होती. वर्धा- यवतमाळ - नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटरचा आहे. एकूण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा असून साडेतीन हजार कोटी खर्चातून तो पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किलोमीटर आणि कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर तसेच वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर /नोंव्हेबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे ग्रामपंचायत असलेले गाव भारतीय रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे.

विजय दर्डा यांच्या निरंतर प्रयत्नांचे यश

विदर्भ व मराठवाडा या महाराष्ट्रातील दोन मागास भागांसाठी संजीवनी ठरणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' राहिला आहे. या प्रकल्पासाठी ते गेल्या तीन दशकांपासून निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २००८ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली गेली. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. खासदारपदी असताना त्यांनी संसदेत या प्रकल्पाची मागणी लावून धरली, शिवाय केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी दर्डा यांनी या प्रकल्पाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच न त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. यानंतर विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी च वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली होती. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

मालधक्कादेखील मंजूर

या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवासदेखील भविष्यात रेल्वेद्वारे तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेडसह इतर रेल्वे मार्गाला १६ हजार कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेwardha-acवर्धाYavatmalयवतमाळNandedनांदेड