शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:42 IST

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : विविध विकासकामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर परिमंडळच्यावतीने वर्धा रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत खासदार तडस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक के.के. मिश्रा, नगरपरिषदचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मदन चावरे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, नगरपरिषदचे पाणी पुरवठा सभापती बंटी गोसावी, नगरसेविका वंदना भुते, नगरसेवक निलेश किटे, कैलास राखडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील सहा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या रेल्वेस्थानकाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्धा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे होणार असल्याने जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. परंतु यासोबतच स्थानकाची देखभाल करणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे. यासाठी रेल्वे मंडळाचे प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी आ.डॉ.पंकज भोयर यांनी केल्यात. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.रेल्वेस्थानकाचा २१ कोटींतून होणार कायापालटमहाराष्ट्रातील ६ स्थानकाला जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी नविन इमारत, बुकींग, आरक्षण केंद्राचे बांधकाम, सहा मीटर रुंदीचा लिप्टसह पुल तयार करण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या पुलाला लिप्ट सुरु करण्यात येणार आहे. नविन पोलिस स्टेशन इमारत, फलाटचे बांधकाम आणि फलाटावर नविन शेड तयार करणे इत्यादी कामे होणार आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सोमेश कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसrailwayरेल्वे