शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:42 IST

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : विविध विकासकामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर परिमंडळच्यावतीने वर्धा रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत खासदार तडस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक के.के. मिश्रा, नगरपरिषदचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मदन चावरे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, नगरपरिषदचे पाणी पुरवठा सभापती बंटी गोसावी, नगरसेविका वंदना भुते, नगरसेवक निलेश किटे, कैलास राखडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील सहा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या रेल्वेस्थानकाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्धा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे होणार असल्याने जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. परंतु यासोबतच स्थानकाची देखभाल करणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे. यासाठी रेल्वे मंडळाचे प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी आ.डॉ.पंकज भोयर यांनी केल्यात. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.रेल्वेस्थानकाचा २१ कोटींतून होणार कायापालटमहाराष्ट्रातील ६ स्थानकाला जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी नविन इमारत, बुकींग, आरक्षण केंद्राचे बांधकाम, सहा मीटर रुंदीचा लिप्टसह पुल तयार करण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या पुलाला लिप्ट सुरु करण्यात येणार आहे. नविन पोलिस स्टेशन इमारत, फलाटचे बांधकाम आणि फलाटावर नविन शेड तयार करणे इत्यादी कामे होणार आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सोमेश कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसrailwayरेल्वे