शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:42 IST

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : विविध विकासकामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर परिमंडळच्यावतीने वर्धा रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत खासदार तडस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक के.के. मिश्रा, नगरपरिषदचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मदन चावरे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, नगरपरिषदचे पाणी पुरवठा सभापती बंटी गोसावी, नगरसेविका वंदना भुते, नगरसेवक निलेश किटे, कैलास राखडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील सहा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या रेल्वेस्थानकाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्धा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे होणार असल्याने जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. परंतु यासोबतच स्थानकाची देखभाल करणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे. यासाठी रेल्वे मंडळाचे प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी आ.डॉ.पंकज भोयर यांनी केल्यात. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.रेल्वेस्थानकाचा २१ कोटींतून होणार कायापालटमहाराष्ट्रातील ६ स्थानकाला जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी नविन इमारत, बुकींग, आरक्षण केंद्राचे बांधकाम, सहा मीटर रुंदीचा लिप्टसह पुल तयार करण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या पुलाला लिप्ट सुरु करण्यात येणार आहे. नविन पोलिस स्टेशन इमारत, फलाटचे बांधकाम आणि फलाटावर नविन शेड तयार करणे इत्यादी कामे होणार आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सोमेश कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसrailwayरेल्वे