शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-नागपूर मार्ग ठरतोय अपघात मार्ग

By admin | Updated: August 31, 2015 01:57 IST

वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सेलूत तहसीलदारांना साकडे : समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारावर्धा : वर्धा- नागपूर महामार्ग हा राज्य क्रमांक ३ चा महामार्ग आहे. परंतु सध्या या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सेलूच्या वीर भगतसिंह संस्थेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत रस्त्यासंबंधी असलेल्या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आले. राज्य महामार्ग असलेल्याा या रस्त्याची अवस्था सध्या एखाद्या पायरस्त्याप्रमाणे झाली आहे. यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य पसरले आहे. यामुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरत आहे. दळण-वळणाचा एक प्रमुख मार्ग असून म्हणून या रस्त्याची नोंद आहे. त्याच कारणाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यात हा फक्त एकपदरी मार्ग असल्याने लहान पासून ते जड वाहनापर्यंतच्या वाहतुकीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. शाळा, महाविद्यालये यातील मुले आणि नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांकरिता हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचा आरोप भगतसिंह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात मार्गावर रोज एक ना एक अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. आतापर्यंत कित्येकांनी या मार्गावर आपले प्राण गमविले आहे. सेलूनजीक मार्गावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात येत आहे. यात पुन्हा त्याची अवस्था जशीच्या तशी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराकडे संपूर्णत: प्रशासन तसेच संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि प्रशासनास जागे करण्यासाठी वीर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूने एक पाऊल उचलत तहसील कार्यालयाला याबाबत निवेदन दिले. या प्रकरणाचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन तहसीलदार सेलू यांनी संस्थेच्या अध्यक्षाला दिले. या समस्येचे योग्य ते निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विर भगतसिंह ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलूच्या सदस्यांकडून करण्यात आला. निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडे तसेच विकास मोरमवार, निसार सैय्यद, करन धनुले, सुरज वैद्य, शिवा डुकरे, मनीष खंडाळकर, सागर डाखोळे, रोशन तळवेकर, विशाल सावरकर, स्वप्नील तिजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)