शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी वर्धा-नागपूर जाम

By admin | Updated: December 10, 2014 23:01 IST

शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून

रायुकाँचा रास्तारोको : शेकडो कार्यकर्त्यांनी रोखला रस्ता, बराचकाळ वाहतुकीचा खोळंबावर्धा : शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून धरण्यात आला़ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली़ यामुळे नायब तहसीलदार प्रीती डुडूरकर यांनी भेट देत निवेदन स्वीकारले़ यानंतर प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांनी रस्ता मोकळा करून दिला़सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण भाव वाढवून देणे सोडून असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. कापसाला केवळ ४ हजार ५० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह सोयाबीन, ऊस व दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले़ विदर्भासह राज्यातील शेतकरी नापिकी व कर्जाने त्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना शासन आपल्याच धुंदीत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतर्फे समीर देशमुख यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले होते़ यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता; पण निवेदनानंतरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांची एकही मागणी शासनाने पूर्ण केली नाही़ याचा निषेध म्हणून बुधवारी रायुकाँने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी विदर्भ व मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत असताना शासन मंत्रीमंडळ विस्तारात गुंतले आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे; पण शासनाला याचे कसलेही सोयरसुतक नाही़ निगरगट्ट शासनाला जाग यावी, यासाठी संपूर्ण राज्यभर युवक आघाडी विविध आंदोलने करीत असल्याचे सांगितले़ समीर देशमुख यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा वाचला़ सोयाबीन व ऊस उत्पादकांच्या मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्या, शेतकऱ्यांना एकरी अनुदान द्यावे, अशी मागणीहीे त्यांनी केली़ रस्तारोको आंदोलनात नगरसेवक सुरेश ठाकरे, मुन्ना झाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय काकडे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. खलील खतीब, मधुकर टोणपे, सुनील भोगे, वसंत वडतकर, बबला लालवाणी, किरण उपाधे, अजीत ठाकरे, आर्वी जिल्हाध्यक्ष संदीप काळे, सेलू तालुकाध्यक्ष अर्चित निघडे, राविकाँ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, महावीर तिवारी, शुभम झाडे, संदीप भगत, चांद खा पठाण, संदीप धुडे, हाफीज पठाण, उत्कर्ष देशमुख, अजय गौळकर, निहाल देशमुख, अमोल भोगे, अतुल वघळे, अजय जानवे, अमीत लुंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या़(कार्यालय प्रतिनिधी)