शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

शेतकऱ्यांसाठी वर्धा-नागपूर जाम

By admin | Updated: December 10, 2014 23:01 IST

शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून

रायुकाँचा रास्तारोको : शेकडो कार्यकर्त्यांनी रोखला रस्ता, बराचकाळ वाहतुकीचा खोळंबावर्धा : शेतमालाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक्स्प्रेस वे वर दत्तपूर चौकात बुधवारी (दि़१०) रस्ता रोको आंदोलन केले़ सुमारे एक तास रस्ता रोखून धरण्यात आला़ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली़ यामुळे नायब तहसीलदार प्रीती डुडूरकर यांनी भेट देत निवेदन स्वीकारले़ यानंतर प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांनी रस्ता मोकळा करून दिला़सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण भाव वाढवून देणे सोडून असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. कापसाला केवळ ४ हजार ५० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह सोयाबीन, ऊस व दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले़ विदर्भासह राज्यातील शेतकरी नापिकी व कर्जाने त्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना शासन आपल्याच धुंदीत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतर्फे समीर देशमुख यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले होते़ यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता; पण निवेदनानंतरही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांची एकही मागणी शासनाने पूर्ण केली नाही़ याचा निषेध म्हणून बुधवारी रायुकाँने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी विदर्भ व मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत असताना शासन मंत्रीमंडळ विस्तारात गुंतले आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे; पण शासनाला याचे कसलेही सोयरसुतक नाही़ निगरगट्ट शासनाला जाग यावी, यासाठी संपूर्ण राज्यभर युवक आघाडी विविध आंदोलने करीत असल्याचे सांगितले़ समीर देशमुख यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा वाचला़ सोयाबीन व ऊस उत्पादकांच्या मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्या, शेतकऱ्यांना एकरी अनुदान द्यावे, अशी मागणीहीे त्यांनी केली़ रस्तारोको आंदोलनात नगरसेवक सुरेश ठाकरे, मुन्ना झाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय काकडे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. खलील खतीब, मधुकर टोणपे, सुनील भोगे, वसंत वडतकर, बबला लालवाणी, किरण उपाधे, अजीत ठाकरे, आर्वी जिल्हाध्यक्ष संदीप काळे, सेलू तालुकाध्यक्ष अर्चित निघडे, राविकाँ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, महावीर तिवारी, शुभम झाडे, संदीप भगत, चांद खा पठाण, संदीप धुडे, हाफीज पठाण, उत्कर्ष देशमुख, अजय गौळकर, निहाल देशमुख, अमोल भोगे, अतुल वघळे, अजय जानवे, अमीत लुंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या़(कार्यालय प्रतिनिधी)