शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हरभऱ्यासह गव्हाला झोडपून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:07 IST

Wardha News झडशी परिसरात दोन दिवस रात्रीला आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी पिकाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पुन्हा एकदा आसमानी फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: झडशी परिसरात दोन दिवस रात्रीला आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी पिकाला फटका बसला आहे.खरीप हंगामत सोयाबीन, कपासीने शेतकऱ्यांना दगा दिल्यानंतर सेलू तालुक्यातील परिसरात रब्बी हंगामात गहू व चणा या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या परिसरात चणा पिकाची सवंगणी सुरु असुन सवंगणी केलेला चणा शेतात पडून आहे बुधवारला व गुरुवारच्याला दुपारच्या सुमारास ११.३० पासून पावसाची हजेरी सुरु झाली.

आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने परिसरातील शेतामध्ये सवंगनी करुन पडलेला चणा ओला झाला. तर काही शेतकऱ्यांचा गहु वादळामुळे झोपल्या गेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तुरीची मळणी व्हायची आहे त्यांच्या तुरीच्या गंज्या सुद्धा ओल्या झाल्या आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. हवामान खात्याने वादळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तविली असुन असे झाल्यास याचा फळबागसह भाजीपाला पिकांना बसण्याची शक्यता असुन विशेषत: कांद्याचे पिकांना अधिक धोका आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामातीलही हातचे पिक जाईल काय या विवंचनेत शेतकरी दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस