शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा

By चैतन्य जोशी | Updated: June 1, 2023 12:13 IST

क्षुल्लक कारणातून हाणामारी : हल्ल्यांसह बलात्कारांच्या घटनांत वाढ

वर्धा : तू माझ्याकडे का बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस... आमच्या अंगणात तुझी गाडी का लावली...खर्रा का दिला नाही... दारू पिण्यास पैसे का दिले नाही... आदी किरकोळ कारणांतून हाणामारी, चाकू हल्ले होत आहेत. अगदी प्राणघातक हल्ल्यांपर्यंत तरुणाईंची मजल गेली आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत तब्बल १० खुनांनी जिल्हा रक्ताळला आहे. त्यामुळे ‘राग क्षणाचा...घात जिंदगीचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञ मंडळीकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेर या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० खुनाच्या घटना घडल्या. तर १२ जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे दुखापती केल्याप्रकरणी ३५८ गुन्हे दाखल करण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दररोज हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यातील अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत जातही नाहीत तर काही प्रकरणात गुन्हे दाखल होतात. एकंदरित हे सर्व पाहता हिंसक वृत्तीच्या कारवाया जिल्ह्यात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘व्यसनाधिनता’

बहुतांश वेळा हल्ल्यामध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गांजा अगदी सहज उपलब्ध होत आहे. किरकोळ कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक घटनांमध्ये आरोपी व्यसनाधीन राहत असल्याचे अनेक घटनांत पुढे आले आहे.

जिल्ह्यात २४ जणी ठरल्या वासनेच्या शिकार

महिलांवरील होणारे अत्याचार चिंताजनक बाब बनली आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल २४ जणी वासनेच्या शिकार ठरल्यात. पोलिसांनी सर्व नराधमांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. मात्र, याला विकृत मानसिकता कारणीभूत आहे, हेही तितकेच खरे.

चार ठिकाणी दरोडा ५८ ठिकाणी घरफोडी

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेरपर्यंत चार ठिकाणी दरोडा पडला, तर ८ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले. इतकेच नव्हे, तर ५८ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून २१६ चोरीच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात चोरी अन् घरफोडीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.

दाखल गुन्ह्यांची आकडेवारी....

  • हत्या- १०
  • जीवघेणा हल्ला - १२
  • दुखापत - ३५८
  • बलात्कार - २४
  • दरोडा - ०४
  • जबरी चोरी - ०८
  • घरफोडी - ५८
  • चोरी - २१६
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा