शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा

By चैतन्य जोशी | Updated: June 1, 2023 12:13 IST

क्षुल्लक कारणातून हाणामारी : हल्ल्यांसह बलात्कारांच्या घटनांत वाढ

वर्धा : तू माझ्याकडे का बघितलेस...गाडी आडवी का लावलीस...रागाने माझ्याकडे का बघतोस... आमच्या अंगणात तुझी गाडी का लावली...खर्रा का दिला नाही... दारू पिण्यास पैसे का दिले नाही... आदी किरकोळ कारणांतून हाणामारी, चाकू हल्ले होत आहेत. अगदी प्राणघातक हल्ल्यांपर्यंत तरुणाईंची मजल गेली आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत तब्बल १० खुनांनी जिल्हा रक्ताळला आहे. त्यामुळे ‘राग क्षणाचा...घात जिंदगीचा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरासह जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासन व नागरिकांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात हे हल्ले खूप मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञ मंडळीकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिकदृष्ट्या ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेर या पाच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० खुनाच्या घटना घडल्या. तर १२ जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे दुखापती केल्याप्रकरणी ३५८ गुन्हे दाखल करण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दररोज हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यातील अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत जातही नाहीत तर काही प्रकरणात गुन्हे दाखल होतात. एकंदरित हे सर्व पाहता हिंसक वृत्तीच्या कारवाया जिल्ह्यात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘व्यसनाधिनता’

बहुतांश वेळा हल्ल्यामध्ये संशयित नशेत असल्याचे आढळून येते आहे. जिल्ह्यात दारू, गांजा अगदी सहज उपलब्ध होत आहे. किरकोळ कारणातून होणाऱ्या हल्ल्यात व्यसनाधिनता केंद्रस्थानी असल्याचे मत काही मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक घटनांमध्ये आरोपी व्यसनाधीन राहत असल्याचे अनेक घटनांत पुढे आले आहे.

जिल्ह्यात २४ जणी ठरल्या वासनेच्या शिकार

महिलांवरील होणारे अत्याचार चिंताजनक बाब बनली आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल २४ जणी वासनेच्या शिकार ठरल्यात. पोलिसांनी सर्व नराधमांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. मात्र, याला विकृत मानसिकता कारणीभूत आहे, हेही तितकेच खरे.

चार ठिकाणी दरोडा ५८ ठिकाणी घरफोडी

जिल्ह्यात जानेवारी ते मे अखेरपर्यंत चार ठिकाणी दरोडा पडला, तर ८ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले. इतकेच नव्हे, तर ५८ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून २१६ चोरीच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात चोरी अन् घरफोडीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.

दाखल गुन्ह्यांची आकडेवारी....

  • हत्या- १०
  • जीवघेणा हल्ला - १२
  • दुखापत - ३५८
  • बलात्कार - २४
  • दरोडा - ०४
  • जबरी चोरी - ०८
  • घरफोडी - ५८
  • चोरी - २१६
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा