शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वाळूघाट लिलावाचा विषय पर्यावरण विभागाकडे ‘पेंडिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाळूघाट लिलावाबाबत काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्मण निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या नियमावलीनूसार तालुकास्तरावरील तांत्रिक समितीद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण करून एकूण ३७ वाळूघाटांचा लिलाव करण्याच्या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

ठळक मुद्देशासनाचा बुडतोय महसूल : अडीच महिने लोटले तरी कार्यवाही शुन्यच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळूघाट लिलावासाठी यंदाच्या वर्षीपासून नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा खनिकर्म विभागाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून एक प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पण त्याला अडीच महिन्यांचा कालावधी लोटूनही पर्यावरण विभागाकडून कुठलीही कायवाई करण्यात न आल्याने तसेच चोरी लपीने वाळूची चोरी होत असल्याने सध्या जिल्हा प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे.प्राप्त माहितीनुसार, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाळूघाट लिलावाबाबत काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्मण निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या नियमावलीनूसार तालुकास्तरावरील तांत्रिक समितीद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण करून एकूण ३७ वाळूघाटांचा लिलाव करण्याच्या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने त्यांचा अहवाल १७ मार्च २०२० ला प्रसिद्ध केला. शिवाय खनिकर्म आराखडा तयार करून १० जून २०२० ला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीचे वृत्त आणि आवश्यक आवश्यक कागदपत्र जोडून सदर वाळूघाटांचा लिलाव करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पर्यावरण विभागाकडे ५ आणि ६ जुलैला प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करून दोन महिने १४ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे. पर्यावरण विभागाने वर्धा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाचा विषय आपल्याकडे का पेंडींग ठेवला आहे हा सध्या संशोधनाचा विषय ठरत असल्याने या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पर्यावरणची हिरवी झेंडी मिळाल्यावर पुढील कार्यवाहीपर्यावरण विभागाकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर जिल्हा खनिकर्म विभागाला निविदा प्रक्रिया पूर्ण करून वाळूघाटांचा लिलाव करावा लागणार आहे. प्रत्यक्षात लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यावरच नेमका किती महसूल जिल्हा प्रशासनाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.विशेष म्हणजे पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत लिलाव प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.जनसुनावणीसह विविध प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पर्यावरण विभागाला ५ आणि ६ जुलै २०२० ला पाठविण्यात आले आहे. लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल. त्यांच्याकडून परवागी मिळाल्यावर निविदा प्रक्रिया करून वाळूघाटांचा प्रत्यक्ष लिलाव करण्यात येईल.- डॉ. इमरान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Thiefचोर