शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 18, 2015 01:54 IST

येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही.

सचिन देवतळे विरुळ(आ.)येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबांचे पुनर्वसन न केल्याने त्यांना वर्षभरापासून अंधाऱ्या रात्रीत सरपटणाऱ्या प्राण्याच्या सानिध्यात चिमुकल्यासह जगावे लागत आहे़बोरी-बाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवाची वस्ती आहे़ मोल-मजुरी करून नेथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागूनच एक मोठा तलाव आहे़ दोन वर्षापूर्वी हा तलाव तुंडूब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतर करून एका शेतात पाल टाकून त्यांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करून दिली. परंतु कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यातही येथील विस्थापितांना पावसाळ्यातही शेतामध्ये दिवस काढावे लागले. येथे कोणतीही शासकीय योजना पोहचली नसल्याने सहा ते सात महिन्यांनी काही गावकरी गावात राहायला गेले. पण काही कुटूंबे अजूनही या शेतातच राहत आहे़ दोन वर्षापासून हे गावकरी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे़ अद्याप साधी वीजही येथे पोहचली नाही़ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ बाकी कुटुंब परत पावसाळा आला की याच शेतात राहायला येतात़ हे गाव सध्या पूर्णपणे भकास झाले आहे़ गावात कोणतीच सोय नाही़ कितीतरी काळापासून ग्रामस्थ बोरी-बाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी करीत आहे. परंतु शासनाद्वारे अद्याप रस्त्याची मागणी पूर्न करण्यात आलेली नाही. बाजाराचे ठिकाण असल्यामुळे येथील नागरिकांना नेहमीच विरूळला यावे लागते़ पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन कि़ मी़ चा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, जाण्यासाठी रस्ता नाही़ रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही़ त्यामुळे विरूळ किंवा पुलगाव येथे बैलबंडीने किंवा पायी जात दवाखाना गाठावा लागतो़ अतिवृष्टी झाली की घरांना ओल चढते. आजार पसरतात. पण वैद्यकीय सुविधेसाठी भटकावे लागते. यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे लोकांच्या हाताला विशेष काम नाही. त्यामुळे आधीच नैराश्य पसरले असताना ही परिस्थिती त्यांना आनखी निराश करीत आहे. त्यामुळे हाताला कम मिळावी अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहे. मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्याला अचानक वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळाचा कटका येथील शेतात पाल टाकून वास्तव्यास असलेल्या कुटूंबांनाही बसला. त्यामुळे तात्काळ विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थ वर्षभरापासून करीत आहे.