शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

दोन वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 18, 2015 01:54 IST

येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही.

सचिन देवतळे विरुळ(आ.)येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबांचे पुनर्वसन न केल्याने त्यांना वर्षभरापासून अंधाऱ्या रात्रीत सरपटणाऱ्या प्राण्याच्या सानिध्यात चिमुकल्यासह जगावे लागत आहे़बोरी-बाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवाची वस्ती आहे़ मोल-मजुरी करून नेथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागूनच एक मोठा तलाव आहे़ दोन वर्षापूर्वी हा तलाव तुंडूब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतर करून एका शेतात पाल टाकून त्यांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करून दिली. परंतु कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यातही येथील विस्थापितांना पावसाळ्यातही शेतामध्ये दिवस काढावे लागले. येथे कोणतीही शासकीय योजना पोहचली नसल्याने सहा ते सात महिन्यांनी काही गावकरी गावात राहायला गेले. पण काही कुटूंबे अजूनही या शेतातच राहत आहे़ दोन वर्षापासून हे गावकरी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे़ अद्याप साधी वीजही येथे पोहचली नाही़ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ बाकी कुटुंब परत पावसाळा आला की याच शेतात राहायला येतात़ हे गाव सध्या पूर्णपणे भकास झाले आहे़ गावात कोणतीच सोय नाही़ कितीतरी काळापासून ग्रामस्थ बोरी-बाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी करीत आहे. परंतु शासनाद्वारे अद्याप रस्त्याची मागणी पूर्न करण्यात आलेली नाही. बाजाराचे ठिकाण असल्यामुळे येथील नागरिकांना नेहमीच विरूळला यावे लागते़ पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन कि़ मी़ चा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, जाण्यासाठी रस्ता नाही़ रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही़ त्यामुळे विरूळ किंवा पुलगाव येथे बैलबंडीने किंवा पायी जात दवाखाना गाठावा लागतो़ अतिवृष्टी झाली की घरांना ओल चढते. आजार पसरतात. पण वैद्यकीय सुविधेसाठी भटकावे लागते. यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे लोकांच्या हाताला विशेष काम नाही. त्यामुळे आधीच नैराश्य पसरले असताना ही परिस्थिती त्यांना आनखी निराश करीत आहे. त्यामुळे हाताला कम मिळावी अशी अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहे. मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्याला अचानक वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळाचा कटका येथील शेतात पाल टाकून वास्तव्यास असलेल्या कुटूंबांनाही बसला. त्यामुळे तात्काळ विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थ वर्षभरापासून करीत आहे.