शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST

परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही.

रोहणा : परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आहे. कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यातही दिवाळी साजरी करण्याकरिता गरजू शेतकरी आपल्या जवळचा कापूस मिळेल त्या भावात खेडा व्यापाऱ्यांना विकत आहे. यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही लुट थांबविण्याकरिता येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रोहणा येथे कापूस प्रक्रिया संस्था आहे. येथे पाणी, अद्यावत यंत्रसामुग्री मजुरांची उपलब्धता आहे. येथे शासकीय व खासगी व्यापारी कापूस खरेदी करण्याची मागणी आहे. येथील केंद्रावर कापसाची आवक देखील बऱ्याच प्रमाणात असते. यावर्षी सोयाबीन या पिकाने बळीराजाला मोठा धक्का दिला. ज्या शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केली त्यांचा खर्च उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे केवळ निराशाच पदरी पडली. अनेकांनी तर कापणी केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहून शेतातील सोयाबीनची कापणी करण्याऐवजी त्यात जनावरे चारली. परिणामी ऐन दिवाळीच्या पर्वावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळी सणाच्या न्युनतम गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र येथे खरेदी केंद्र नसल्याने त्यांची फजिती झाली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाच ते दहा क्विंटलच्या सरासरीने कापूस आला आहे. तो विकून दिवाळी साजरी करावी तर स्थानिक कापूस खरेदी केंद्रात अजूनही कापूस खरेदी सुरू झाली नाही. दिवाळीची गरज लक्षात घेता खासगी व्यापारी दररोज कापसाच्या भावात घट करीत आहे. ‘सरकी उतरली, गाठीचे भाव पडले’ अशी कारणे सांगून व्यापारी वर्ग कापूस उत्पादकांना नाडविण्याची संधी सोडायला तयार नाही. कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये असताना ३ हजार ७०० ते चार हजार रुपये कापसाची खेडा व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू आहे. काही शेतकरी आपला कापूस मालवाहू गाडीत भरून आर्वी येथे विक्रीस नेत आहे. त्यात त्यांना ५० रुपये जास्त मिळतात तर गाडी भाडेमध्ये मोठी रक्कम खर्ची लागते. याकरिता येथे खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्याचा आर्थिक फटका गरजू कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील बराच कापूस बाहेर गेल्यावर स्थानिक केंद्र सुरू झाल्यास केंद्रातील संकलनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना केंद्राची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)