शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST

परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही.

रोहणा : परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आहे. कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यातही दिवाळी साजरी करण्याकरिता गरजू शेतकरी आपल्या जवळचा कापूस मिळेल त्या भावात खेडा व्यापाऱ्यांना विकत आहे. यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही लुट थांबविण्याकरिता येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रोहणा येथे कापूस प्रक्रिया संस्था आहे. येथे पाणी, अद्यावत यंत्रसामुग्री मजुरांची उपलब्धता आहे. येथे शासकीय व खासगी व्यापारी कापूस खरेदी करण्याची मागणी आहे. येथील केंद्रावर कापसाची आवक देखील बऱ्याच प्रमाणात असते. यावर्षी सोयाबीन या पिकाने बळीराजाला मोठा धक्का दिला. ज्या शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केली त्यांचा खर्च उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे केवळ निराशाच पदरी पडली. अनेकांनी तर कापणी केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहून शेतातील सोयाबीनची कापणी करण्याऐवजी त्यात जनावरे चारली. परिणामी ऐन दिवाळीच्या पर्वावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळी सणाच्या न्युनतम गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र येथे खरेदी केंद्र नसल्याने त्यांची फजिती झाली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाच ते दहा क्विंटलच्या सरासरीने कापूस आला आहे. तो विकून दिवाळी साजरी करावी तर स्थानिक कापूस खरेदी केंद्रात अजूनही कापूस खरेदी सुरू झाली नाही. दिवाळीची गरज लक्षात घेता खासगी व्यापारी दररोज कापसाच्या भावात घट करीत आहे. ‘सरकी उतरली, गाठीचे भाव पडले’ अशी कारणे सांगून व्यापारी वर्ग कापूस उत्पादकांना नाडविण्याची संधी सोडायला तयार नाही. कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये असताना ३ हजार ७०० ते चार हजार रुपये कापसाची खेडा व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू आहे. काही शेतकरी आपला कापूस मालवाहू गाडीत भरून आर्वी येथे विक्रीस नेत आहे. त्यात त्यांना ५० रुपये जास्त मिळतात तर गाडी भाडेमध्ये मोठी रक्कम खर्ची लागते. याकरिता येथे खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्याचा आर्थिक फटका गरजू कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील बराच कापूस बाहेर गेल्यावर स्थानिक केंद्र सुरू झाल्यास केंद्रातील संकलनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना केंद्राची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)