शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST

परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही.

रोहणा : परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. त्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आहे. कापूस उत्पादकांना खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. यातही दिवाळी साजरी करण्याकरिता गरजू शेतकरी आपल्या जवळचा कापूस मिळेल त्या भावात खेडा व्यापाऱ्यांना विकत आहे. यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही लुट थांबविण्याकरिता येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रोहणा येथे कापूस प्रक्रिया संस्था आहे. येथे पाणी, अद्यावत यंत्रसामुग्री मजुरांची उपलब्धता आहे. येथे शासकीय व खासगी व्यापारी कापूस खरेदी करण्याची मागणी आहे. येथील केंद्रावर कापसाची आवक देखील बऱ्याच प्रमाणात असते. यावर्षी सोयाबीन या पिकाने बळीराजाला मोठा धक्का दिला. ज्या शेतकऱ्यांनी कापणी व मळणी केली त्यांचा खर्च उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे केवळ निराशाच पदरी पडली. अनेकांनी तर कापणी केलेल्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहून शेतातील सोयाबीनची कापणी करण्याऐवजी त्यात जनावरे चारली. परिणामी ऐन दिवाळीच्या पर्वावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळी सणाच्या न्युनतम गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र येथे खरेदी केंद्र नसल्याने त्यांची फजिती झाली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाच ते दहा क्विंटलच्या सरासरीने कापूस आला आहे. तो विकून दिवाळी साजरी करावी तर स्थानिक कापूस खरेदी केंद्रात अजूनही कापूस खरेदी सुरू झाली नाही. दिवाळीची गरज लक्षात घेता खासगी व्यापारी दररोज कापसाच्या भावात घट करीत आहे. ‘सरकी उतरली, गाठीचे भाव पडले’ अशी कारणे सांगून व्यापारी वर्ग कापूस उत्पादकांना नाडविण्याची संधी सोडायला तयार नाही. कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये असताना ३ हजार ७०० ते चार हजार रुपये कापसाची खेडा व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू आहे. काही शेतकरी आपला कापूस मालवाहू गाडीत भरून आर्वी येथे विक्रीस नेत आहे. त्यात त्यांना ५० रुपये जास्त मिळतात तर गाडी भाडेमध्ये मोठी रक्कम खर्ची लागते. याकरिता येथे खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्याचा आर्थिक फटका गरजू कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील बराच कापूस बाहेर गेल्यावर स्थानिक केंद्र सुरू झाल्यास केंद्रातील संकलनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना केंद्राची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)