लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतपांदण रस्त्याचा विकास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता प्रत्येक शासनाने योजना राबविल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पालकमंत्री पांदण रस्ता विकास योजना राबविण्यात आली. स्वत तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही लोकवर्गणीतून पांदन रस्ता विकास कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र योजनांच्या अंमलबजावणीनंतरही पांदन रस्त्याबाबत शेतकºयांचा त्रास कमी झालेला नाही. धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी या शिवारातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पांदण रस्ता दुरुस्ती, खडीकरणासाठी मागणी केली आहे. या परिसरातील इतरही गावातील पांदणींना विळखा घातला आहे. मात्र शासकीय यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नाही. शेतकºयांची अडचण कायम आहे.पांदणीच्या खडीकरणाचे काय?जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यात लोकसहभागातून अनेक पांदण रस्त्याचा विकास करण्यात आला. यात पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटले. पांदण रस्ते मोकळे झाले. मात्र या पांदण रस्ता खडीकरण कामासाठी निधीची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यांच्या दिवसात या रस्त्यातून मार्ग काढणे शेतकऱ्यासाठी दिव्य संकटच ठरत आहे. जिल्ह्यात ७०० ते ८०० पांदन रस्ते असून सर्वत्र सारखीच परिस्थिती दिसून येत आहे.
शेतपांदणीची ‘वाट’ बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST
धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी या शिवारातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पांदण रस्ता दुरुस्ती,
शेतपांदणीची ‘वाट’ बिकट
ठळक मुद्देपावसाळ्यात शेतकऱ्यांची अडचण वाढली । शासनाच्या योजना कागदावरच