शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाई नाल्याला आला पूर; गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सततच्या पावसामुळे सालदरा तलावातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने वाई येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, पुलापलीकडील गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. दुपारच्या सुमारास घरून कामासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेरदेखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे. नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो. यामुळे वाहतूक ठप्प होते. परिणामी पूर ओसरत पर्यंत प्रतिक्षा करावी लागते. ५ वर्षांपूर्वी  वसंत पुनवाटकर हा नागरिक याचपुलाला आलेल्या पुरात वाहून गेला असून त्याला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कुणीही या गंभीर समस्येची दखल घेण्यात धन्यता मानली नाही. अखेर यंदाच्या पावसाळ्यातही सततच्या पावसाने पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून गावाचा संपर्क तुटल्याने पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

माजी सरपंचांचा ठिय्यानागरिक पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्यातून पूल ओलांडू नये, यासाठी माजी सरपंच गणेश गचकेश्वर, पोलीस पाटील, कोतवाल आदींसह काही नागरिक नाल्याच्या बाजूला ठिय्या मांडून बसले असून नागरिकांना आवागमन करण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर