शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी; शेती अभ्यासकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:40 IST

agricultural laborers Wardha News शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

ठळक मुद्देविजय जावंधिया यांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पण, अद्याप शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. इतकेच काय बऱ्याचदा बाजारात अपेक्षित हमीभावही मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.२०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास शेती खर्चावर आधारित ५० टक्के नफा जोडून शेतमालाला भाव दिला जाईल, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन हे भाव देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट केले जाईल, अशी घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार, हे कळायला मार्ग नाही. आता नवीन तीन विधेयकांची घोषणा केली आहे. या तीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे गेल्या ७० वर्षांपासून कृषी बाजार समितीमध्ये होणारे शोषण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या विधेयकांमुळे शेतकरी शोषणमुक्त होऊन त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितले जात आहे. पण, वास्तविकता वेगळी असून त्यासाठी योग्य उपाययोजनेची गरजही शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.

दुप्पट मजुरीनुसार समर्थनमूल्य घोषित करावेसरकारने कोरोना महामारीच्या मदत निधीमध्ये मनरेगाच्या मजुरीत केवळ १८ रुपये प्रतिदिवसाने वाढ करून १८२ रुपयांवरुन २०० रुपये केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न खरेच दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरी दुप्पट करून १८२ ऐवजी ३६४ रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी. कृषी मूल्य आयोग व लागत आयोगाला या मजुरीला हिशेबात घेऊन समर्थन मूल्य घोषित करण्यास सांगावे. जर हे भाव बाजार समितीच्या बाहेर मिळत नसेल तर सरकारने हस्तक्षेप करावा. भावांतर योजनांच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून योग्य वाढ करावी, अशी मागणीही जावंधिया यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी