शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी; शेती अभ्यासकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:40 IST

agricultural laborers Wardha News शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

ठळक मुद्देविजय जावंधिया यांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पण, अद्याप शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. इतकेच काय बऱ्याचदा बाजारात अपेक्षित हमीभावही मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरीही दुप्पट करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.२०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास शेती खर्चावर आधारित ५० टक्के नफा जोडून शेतमालाला भाव दिला जाईल, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन हे भाव देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट केले जाईल, अशी घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार, हे कळायला मार्ग नाही. आता नवीन तीन विधेयकांची घोषणा केली आहे. या तीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे गेल्या ७० वर्षांपासून कृषी बाजार समितीमध्ये होणारे शोषण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या विधेयकांमुळे शेतकरी शोषणमुक्त होऊन त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितले जात आहे. पण, वास्तविकता वेगळी असून त्यासाठी योग्य उपाययोजनेची गरजही शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.

दुप्पट मजुरीनुसार समर्थनमूल्य घोषित करावेसरकारने कोरोना महामारीच्या मदत निधीमध्ये मनरेगाच्या मजुरीत केवळ १८ रुपये प्रतिदिवसाने वाढ करून १८२ रुपयांवरुन २०० रुपये केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न खरेच दुप्पट करायचे असेल तर शेतमजुरांची मजुरी दुप्पट करून १८२ ऐवजी ३६४ रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी. कृषी मूल्य आयोग व लागत आयोगाला या मजुरीला हिशेबात घेऊन समर्थन मूल्य घोषित करण्यास सांगावे. जर हे भाव बाजार समितीच्या बाहेर मिळत नसेल तर सरकारने हस्तक्षेप करावा. भावांतर योजनांच्या माध्यमातून किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून योग्य वाढ करावी, अशी मागणीही जावंधिया यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी