शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

ग्रामसेविकेच्या अनुपस्थितीने गावकरी त्रस्त

By admin | Updated: September 10, 2015 02:35 IST

भानखेडा ग्रा.पं. च्या ग्रामसेविका महिन्यात एकच दिवस गावात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

भानखेडा येथील प्रकार : गावातील विकास कामांना बसली खीळवर्धा : भानखेडा ग्रा.पं. च्या ग्रामसेविका महिन्यात एकच दिवस गावात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विकासाला खीळ बसली, असा आरोप ग्रा.पं. पदाधिकारी करीत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली; पण कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सरपंचाने म्हटले आहे. शासन व ग्रा. पं. प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून ग्रामसेवक कार्यरत असतात; पण तेच अनुपस्थित राहत असल्याने विकासकामे खोळंबतात. असाच प्रकार भानखेडा येथे घडत आहे. येथील ग्रामसेविका महिन्यातून एकच दिवस गावात येतात. परिणामी, गावातील व नागरिकांची संबधित कामे खोळंबली आहे. याबाबतच्या तक्रारीचाही उपयोग झाला नाही. ग्रामसेविका अनुपस्थित राहत असल्याने विद्यार्थी, शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळत नाही. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सदर ग्रामसेविकेवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा किसना चौधरी, प्रीतम हिवंज, रामा गायकवाड, श्रीराम खऊट, विनोद हिवंज, निरंजन चौधरी आदींनी निवेदनातून प्रशासनास दिला आहे. सदर ग्रामसेविकेशी संपर्क होऊ शकला नाही.(तालुका प्रतिनिधी)याबाबत वरिष्ठांना वारंवार तक्रारी केल्या; पण कारवाई झाली नाही. ग्रामसेविका हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांसह विकास कामेही थांबली आहेत. ही समस्या त्वरित मार्गी न लावल्यास ग्रामस्थांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.- महेश देवडे, सरपंच, भानखेडा.गावातील विकास कामे होत नसल्याची ओरड आहे. यापूर्वीही ग्रा.पं. ला भेट दिली, तेव्हा ग्रामसेविका थूल गैरहजर होत्या. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता उत्तर मिळाले नाही. या ग्रा.पं.ला स्वत: भेट देऊन तातडीने कारवाई करण्यात येईल. -दिलीप ढोणे, विस्तार अधिकारी, तरोडा सर्कल, पं.स. वर्धा.