शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गावात सुविधा मिळेनात, जऊरवाडा ग्रामपंचायतीला ठोकले गावकऱ्यांनी कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:40 IST

ग्रामस्थ आक्रमक : सरपंच, सचिवांचे दुर्लक्ष ठरले कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घाडगे) : तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या जऊरवाडा ग्रामपंचायत परिसरात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, सरपंच व सचिवांना वारंवार कळवूनसुद्धा दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप भिसे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

गावातील समस्या सोडविण्यासंदर्भात शिवसेनेचे संदीप भिसे यांच्या नेतृत्वात कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. येथील सरपंच वर्ध्यातून कामकाज पाहतात ते गावात राहत नाही. तसेच सचिवांकडे या ग्रामपंचायतचा अतिरिक्त कारभार असल्याने ते गावाला नियमित वेळ देत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला नियमित सचिव देण्यात यावा तसेच येथील शिपाईसुद्धा काटोलला राहत असल्याने गावातील पाणीपुरवठा अनियमित होतो. गावातील दिवाबत्ती बंद राहते आणि चालू केली तर दुपारपर्यंत चालूच राहते. शिवाय पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने व पाणीपुरवठ्याच्या विहिरीत कचरा असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडरही टाकली जात नाही, अशा अनेक समस्या निवेदनात नमूद करून त्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. परंतु, या निवेदनानंतरही ग्रामपंचायत प्रशासन किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर मंगळवारी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. यावेळी गावातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. यासंदर्भात ग्रामपंचायत सरपंचांशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी 'मी ड्रायव्हिंग करीत आहे, आता बोलता येणार नाही, नंतर बोलू' असे सांगितले.

विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर आवश्यक त्या प्रमाणात वारंवार टाकली जाते. सामान्य फंडामध्ये सध्या पैसे नसल्याने गावातील नाली सफाईकरिता विलंब झाला. आता दोन ते तीन दिवसात नालीसफाईचे काम पूर्ण होणार आहे. माझ्याकडे तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे दिलेल्या दिवसावर मी नियमित ग्रामपंचायतमध्ये जातो. ग्रामपंचायतचे शिपाई यांना ग्रामपंचायत नियमित उघडण्याबाबत व ग्रामपंचायत उघडी ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.- संजय येवले, सचिव, ग्रामपंचायत, जऊरवाडा, 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwardha-acवर्धा