शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

साहूरचे पुनर्वसन करणार तरी कधी? तीन दशकांनंतरही प्रश्न रेंगाळलेलाच, प्रशासनाकडूनही हात वर

By आनंद इंगोले | Updated: December 5, 2022 15:01 IST

पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त

वर्धा : आष्टी तालुक्यातील साहूर या गावापासून मंजुळा (जाम) नदी वाहते. सन १९९० मध्ये २८ ऑगस्ट रोजी साहूरवासी गाढ झोपेत असताना मंजुळा कोपली. सततच्या पावसाने रात्री १२ वाजता नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले आणि अंधारात एकच कल्लोळ उठला. नागरिक मिळेल त्या दिशेने जीव मुठीत घेऊन सैरभैर पळायला लागले. भांडीकुडी, अन्नधान्य व पैसाअडका या पुरात वाहून गेला. कुणाचे घरे कोसळली, कुणाची जनावरे दगावली; पण सुदैवाने मानवांचा जीव वाचला. या महापुराने नागरिकांना जीवदान दिले; पण आज तीन दशकांपेक्षा अधिक काळ उलटूनही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

साहूरमधील १९९० च्या महापुरात ३६ कुटुंबातील जवळपास २०० नागरिकांची आबाळ झाली. एका रात्रीतून त्यांचं होत्याचं नव्हतं झाल्याने, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गावाला भेट देऊन या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच इतरही आमदार, मंत्र्यांनी या गावाच्या पुनर्वसनाचे आश्वासन गावकऱ्यांना दिले; परंतु या गावात आल्यावर त्यांची पाठ फिरताच आश्वासनही हवेतच विरून गेले.

दरम्यानच्या काळात अमरावती जिल्ह्यात पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी ३ कोटी ४८ लाखांचा निधी देण्यात आला; पण साहूरवासीयांची आठवण झाली नाही. म्हणून २०१६ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन पुनर्वसनाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती; परंतु साहूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. शासनासोबतच प्रशासकीय उदासीनता कायम असल्याने आता पूरगस्तांची मुले मोठी होऊन त्यांनाही लेकरंबाळं झालीत, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

मानव जोडो संघटनेचा लढा कायम

साहूर येथील ३६ पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी रमेशचंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात मानव जोडो संघटनेच्या माध्यमातून दिंडी, उपोषण, सत्याग्रह व आंदोलने केलीत. त्यानंतर या पीडितांना भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातही अधिकाऱ्यांनी चुकीचे ले-आउट टाकून भूखंडाचे वाटप केले. त्या भूखंडांच्या शेजारीच आर्वी-वरुड राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री पुनर्वसन झाल्याने दाखले असून, प्रत्यक्षात चित्र फार वेगळे आहे. आजही मानव जोडो संघटनेच्या माध्यमातून पुनर्वसनाकरिता लढा कायम असून, त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट कधी उगवेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा