शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

साहूरचे पुनर्वसन करणार तरी कधी? तीन दशकांनंतरही प्रश्न रेंगाळलेलाच, प्रशासनाकडूनही हात वर

By आनंद इंगोले | Updated: December 5, 2022 15:01 IST

पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त

वर्धा : आष्टी तालुक्यातील साहूर या गावापासून मंजुळा (जाम) नदी वाहते. सन १९९० मध्ये २८ ऑगस्ट रोजी साहूरवासी गाढ झोपेत असताना मंजुळा कोपली. सततच्या पावसाने रात्री १२ वाजता नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले आणि अंधारात एकच कल्लोळ उठला. नागरिक मिळेल त्या दिशेने जीव मुठीत घेऊन सैरभैर पळायला लागले. भांडीकुडी, अन्नधान्य व पैसाअडका या पुरात वाहून गेला. कुणाचे घरे कोसळली, कुणाची जनावरे दगावली; पण सुदैवाने मानवांचा जीव वाचला. या महापुराने नागरिकांना जीवदान दिले; पण आज तीन दशकांपेक्षा अधिक काळ उलटूनही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

साहूरमधील १९९० च्या महापुरात ३६ कुटुंबातील जवळपास २०० नागरिकांची आबाळ झाली. एका रात्रीतून त्यांचं होत्याचं नव्हतं झाल्याने, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गावाला भेट देऊन या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच इतरही आमदार, मंत्र्यांनी या गावाच्या पुनर्वसनाचे आश्वासन गावकऱ्यांना दिले; परंतु या गावात आल्यावर त्यांची पाठ फिरताच आश्वासनही हवेतच विरून गेले.

दरम्यानच्या काळात अमरावती जिल्ह्यात पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी ३ कोटी ४८ लाखांचा निधी देण्यात आला; पण साहूरवासीयांची आठवण झाली नाही. म्हणून २०१६ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन पुनर्वसनाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती; परंतु साहूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. शासनासोबतच प्रशासकीय उदासीनता कायम असल्याने आता पूरगस्तांची मुले मोठी होऊन त्यांनाही लेकरंबाळं झालीत, तरीही पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

मानव जोडो संघटनेचा लढा कायम

साहूर येथील ३६ पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी रमेशचंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात मानव जोडो संघटनेच्या माध्यमातून दिंडी, उपोषण, सत्याग्रह व आंदोलने केलीत. त्यानंतर या पीडितांना भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातही अधिकाऱ्यांनी चुकीचे ले-आउट टाकून भूखंडाचे वाटप केले. त्या भूखंडांच्या शेजारीच आर्वी-वरुड राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री पुनर्वसन झाल्याने दाखले असून, प्रत्यक्षात चित्र फार वेगळे आहे. आजही मानव जोडो संघटनेच्या माध्यमातून पुनर्वसनाकरिता लढा कायम असून, त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट कधी उगवेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा