शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:49 IST

आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देआमगाव (खडकी) येथील रसायनयुक्त पाणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. याची सूचना तहसीलदारांना देताच त्यांनी गावाला भेट देत ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल येईस्तोवर पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सांगितले. आता आठ दिवस लोटूनही गावातील पाणीपुरवठा ठप्पच आहे.पाण्याचे नमून पाठवून आठ दिवस लोटलेत; पण अद्यापही प्रयोगशाळेकडून पाण्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. गावात दोन टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे; पण टँकरचे पाणी अपूरे पडत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था झाली आहे.या घटनेनंतर सलग पाच दिवस सेलूचे तहसीलदार सोनवणे, ठाणेदार ब्राह्मणे, पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे बुंदेले, विस्तार अधिकारी पं.स. सेलू, जि.प. सदस्य विनोद लाखे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालविकास सभापती सुनीता कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे सेलू, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींनी आमगाव येथे भेट दिली. या पदाधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील देण्यात आली. अद्यापही प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंदच आहे. ग्रामस्थांना दोन टँकरच्या माध्यमातून तात्पूरता पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याने तहाण भागत नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय पशु पालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे सध्या आमगाव येथील नागरिकांचे लक्ष पाणी अहवालाकडे लागले आहे. आणखी किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी