शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:49 IST

आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देआमगाव (खडकी) येथील रसायनयुक्त पाणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. याची सूचना तहसीलदारांना देताच त्यांनी गावाला भेट देत ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल येईस्तोवर पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सांगितले. आता आठ दिवस लोटूनही गावातील पाणीपुरवठा ठप्पच आहे.पाण्याचे नमून पाठवून आठ दिवस लोटलेत; पण अद्यापही प्रयोगशाळेकडून पाण्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. गावात दोन टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे; पण टँकरचे पाणी अपूरे पडत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था झाली आहे.या घटनेनंतर सलग पाच दिवस सेलूचे तहसीलदार सोनवणे, ठाणेदार ब्राह्मणे, पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे बुंदेले, विस्तार अधिकारी पं.स. सेलू, जि.प. सदस्य विनोद लाखे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालविकास सभापती सुनीता कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे सेलू, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींनी आमगाव येथे भेट दिली. या पदाधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील देण्यात आली. अद्यापही प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंदच आहे. ग्रामस्थांना दोन टँकरच्या माध्यमातून तात्पूरता पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याने तहाण भागत नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय पशु पालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे सध्या आमगाव येथील नागरिकांचे लक्ष पाणी अहवालाकडे लागले आहे. आणखी किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी