शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:49 IST

आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देआमगाव (खडकी) येथील रसायनयुक्त पाणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. याची सूचना तहसीलदारांना देताच त्यांनी गावाला भेट देत ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल येईस्तोवर पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सांगितले. आता आठ दिवस लोटूनही गावातील पाणीपुरवठा ठप्पच आहे.पाण्याचे नमून पाठवून आठ दिवस लोटलेत; पण अद्यापही प्रयोगशाळेकडून पाण्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. गावात दोन टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे; पण टँकरचे पाणी अपूरे पडत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था झाली आहे.या घटनेनंतर सलग पाच दिवस सेलूचे तहसीलदार सोनवणे, ठाणेदार ब्राह्मणे, पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे बुंदेले, विस्तार अधिकारी पं.स. सेलू, जि.प. सदस्य विनोद लाखे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालविकास सभापती सुनीता कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे सेलू, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींनी आमगाव येथे भेट दिली. या पदाधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील देण्यात आली. अद्यापही प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंदच आहे. ग्रामस्थांना दोन टँकरच्या माध्यमातून तात्पूरता पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याने तहाण भागत नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय पशु पालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे सध्या आमगाव येथील नागरिकांचे लक्ष पाणी अहवालाकडे लागले आहे. आणखी किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी