शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांमधून विदर्भ बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते.

ठळक मुद्देवारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर : पाच पालख्यांना परवानगी देण्याची मागणी

प्रमोद भोजने।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे यावर्षी पंढरपुरला जाणारा पायदळ दिंडी सोहळा रद्द करण्यात आला. मानाच्या सहा पालख्यांमधील पादुका व काही वारकऱ्यांना हेलीकॉप्टर, विमान किंवा वाहनाने पंढरपुरला नेण्याची शासनाने सहमती दर्शविली आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत.परंतु, या सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश नसल्याने विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आई रुख्मिनी मातेला साडीचोळी देवून बोळवन केली जाते. त्यानंतर रुख्मिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेतात. तेथेच पाडुरंगाचे दर्शन घेतले जाते. त्याचप्रमाणे रुख्मिनी माता संस्थान कौंडन्यपूर मठ, पंढरपूर येथील मठातून दररोज पांडुरंगाला नैवद्य सुद्धा दिला जातो. ही परंपरा गेल्या ४२५ वर्षापासून सुरु आहेत. मात्र, या परंपरेला यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील संत श्री गुलाबराव महाराज (माधान) भक्तिधाम चांदूरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान, व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट, संत शिवराम महाराज संस्थान, वरुड (जळका) येथीलही पालख्या दरवर्षी पंढरपुरला जात असतात. त्याचा शासनाने कुठेही उल्लेख केला नसल्याने या पाखल्यांची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत न करता याही पालख्यांना पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी द्यावी, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांकडून केली जात आहे.शेकडो वर्षाच्या परंपरेचा विचार व्हावाशासनाने विदर्भातील वारकऱ्यांची शकडो वर्षांची परंपरा लक्षात घेता विदर्भातील रुख्मिनी माता संस्थान कौडन्यपूर, संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम चांदुरबाजार, संत भास्कर महाराज संस्थान व संत वासुदेव महाराज संस्थान आकोट आणि संत शिवराम महाराज संस्थान वरुड (जळका) या पाच पालख्यांचा पंढरपुरला जाण्याची परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त २५ वारकरी वारी पूर्ण करतील. शासनाने जर परवानगी दिली नाही तर विदर्भातील वारकरी पाच पालख्यांमधील पादुका स्वत: च्या वाहनाने पंढरपुरला आणतील, असा इशारा युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना साकडेविदर्भातील वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन विदर्भातील पालख्यांना परवानगी द्यावी, याकरिता युवा विश्व वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश महाराज शेटे, श्याम महाराज चौबे, मोहन महाराज मेतकर, राम महाराज गव्हारे, पुरुषोत्तम महाराज रौराळे, दिलीप खताळे, प्रकाश दिवे, दिवाकर किटे, मनोहर महाराज कायटे या वारकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री यशोमती ठाकूर, ना.बच्चू कडू, पंढरपुरचे आमदार नाना भाळके, सोलापूरचे जिल्हाधिकारी व अमरावतीे विभागीय आयुक्त यांना निवेदनातून साकडे घातले आहेत.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर