शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजारांवर नागरिकांनी केली जात प्रमाणपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:55 IST

शैक्षणिक कामांसह निवडणूक व सेवा कार्याकरिता आरक्षित प्रवर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्ध्यातील प्रकरणांचा विचार करता अडीच वर्षापूर्वी वर्ध्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयातून आतापर्यंत २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विशेषत: येथे उपायुक्त तथा समिती सदस्य पदावर वर्धेकर अधिकारी असल्याने कार्यालयातील कामानेही गती पकडली आहे.

ठळक मुद्देअडीच वर्षात समितीची कामगिरी : वर्धेकर अधिकारी असल्याने कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक कामांसह निवडणूक व सेवा कार्याकरिता आरक्षित प्रवर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्ध्यातील प्रकरणांचा विचार करता अडीच वर्षापूर्वी वर्ध्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयातून आतापर्यंत २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विशेषत: येथे उपायुक्त तथा समिती सदस्य पदावर वर्धेकर अधिकारी असल्याने कार्यालयातील कामानेही गती पकडली आहे.स्थानिक सेवाग्राम रोडलगतच्या सामाजिक न्याय भवनात २१ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. पूर्वी विद्यार्थ्यांसह नागरिकांना नागपुरच्या कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. परंतु वर्ध्यात कार्यालय सुरु झाल्यापासून विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २१ नोव्हेंबर २०१६ ते जून २०१९ पर्यंत शैक्षणिक, सेवापूर्व, सेवांतर्गत, निवडणूक व इतर असे एकूण २१ हजार ९१५ जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे कार्यालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी २१ हजार ४६३ प्रकरणे वैध ठरले तर २ हजार ३०८ प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुट्यांअभावी नामंजूर करण्यात आले. वर्ध्यात कार्यालय सुरु झाल्यानंतर नागपूर कार्यालयात वर्ध्यातील प्रलंबित असलेले प्रकरणेही या कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्यासर्व प्रकरणाचा विचार केल्यास आतापर्यंत या कार्यालयाने २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा केला आहे. या कार्यालयातील कामकाजाची दखल घेत प्रकरणाचा निपटारा करण्यामध्ये राज्यात नावलौकीक केले आहे.शैक्षणिक आणि निवडणूक प्रकरणांचीच गर्दीआरक्षित प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. तसेच निवडणुकीकरिताही या प्रमाणपत्राची गरज भासत असल्याने शैक्षणिक आणि निवडणूक कार्यासाठीचेच अर्ज जास्त असतात. मागील अडीच वर्षाचा मागोवा घेतला असता शैक्षणिक कामाकरिता १७ हजार २९१ तर निवडणूक कामाकरिता ३ हजार ६२३ अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहे.एका प्रकरणाच्या मंजूरीकरिता तीन ते सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कार्यालयाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची आॅनलाईन नोंदणी करुन कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या बैठकीत त्या प्रकरणाची अंतिम तपासणी करुन आक्षेप नोंदविले जाते. प्रकरणातील त्रुटी किंवा आक्षेपाबाबतही संपूर्ण माहिती अर्जदाराला एसएमएस व्दारे दिली जाते. त्याहीनंतर त्याने प्रतिसाद दिला नाही तर कार्यालयाच्यावतीने त्यांना फोन करुन माहिती दिली जाते. जिल्ह्यातील नागरिकांचे काम सोपे व्हावे याकरिताच हे कार्यालय असून त्यानुसार सेवा दिली जात आहे.- सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय वर्धा.