शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

२३ हजारांवर नागरिकांनी केली जात प्रमाणपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:55 IST

शैक्षणिक कामांसह निवडणूक व सेवा कार्याकरिता आरक्षित प्रवर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्ध्यातील प्रकरणांचा विचार करता अडीच वर्षापूर्वी वर्ध्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयातून आतापर्यंत २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विशेषत: येथे उपायुक्त तथा समिती सदस्य पदावर वर्धेकर अधिकारी असल्याने कार्यालयातील कामानेही गती पकडली आहे.

ठळक मुद्देअडीच वर्षात समितीची कामगिरी : वर्धेकर अधिकारी असल्याने कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक कामांसह निवडणूक व सेवा कार्याकरिता आरक्षित प्रवर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे वर्ध्यातील प्रकरणांचा विचार करता अडीच वर्षापूर्वी वर्ध्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयातून आतापर्यंत २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विशेषत: येथे उपायुक्त तथा समिती सदस्य पदावर वर्धेकर अधिकारी असल्याने कार्यालयातील कामानेही गती पकडली आहे.स्थानिक सेवाग्राम रोडलगतच्या सामाजिक न्याय भवनात २१ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. पूर्वी विद्यार्थ्यांसह नागरिकांना नागपुरच्या कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. परंतु वर्ध्यात कार्यालय सुरु झाल्यापासून विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २१ नोव्हेंबर २०१६ ते जून २०१९ पर्यंत शैक्षणिक, सेवापूर्व, सेवांतर्गत, निवडणूक व इतर असे एकूण २१ हजार ९१५ जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे कार्यालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी २१ हजार ४६३ प्रकरणे वैध ठरले तर २ हजार ३०८ प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुट्यांअभावी नामंजूर करण्यात आले. वर्ध्यात कार्यालय सुरु झाल्यानंतर नागपूर कार्यालयात वर्ध्यातील प्रलंबित असलेले प्रकरणेही या कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्यासर्व प्रकरणाचा विचार केल्यास आतापर्यंत या कार्यालयाने २३ हजार ८६६ प्रकरणांचा निपटारा केला आहे. या कार्यालयातील कामकाजाची दखल घेत प्रकरणाचा निपटारा करण्यामध्ये राज्यात नावलौकीक केले आहे.शैक्षणिक आणि निवडणूक प्रकरणांचीच गर्दीआरक्षित प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता असते. तसेच निवडणुकीकरिताही या प्रमाणपत्राची गरज भासत असल्याने शैक्षणिक आणि निवडणूक कार्यासाठीचेच अर्ज जास्त असतात. मागील अडीच वर्षाचा मागोवा घेतला असता शैक्षणिक कामाकरिता १७ हजार २९१ तर निवडणूक कामाकरिता ३ हजार ६२३ अर्ज कार्यालयात प्राप्त झाले आहे.एका प्रकरणाच्या मंजूरीकरिता तीन ते सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कार्यालयाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची आॅनलाईन नोंदणी करुन कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या बैठकीत त्या प्रकरणाची अंतिम तपासणी करुन आक्षेप नोंदविले जाते. प्रकरणातील त्रुटी किंवा आक्षेपाबाबतही संपूर्ण माहिती अर्जदाराला एसएमएस व्दारे दिली जाते. त्याहीनंतर त्याने प्रतिसाद दिला नाही तर कार्यालयाच्यावतीने त्यांना फोन करुन माहिती दिली जाते. जिल्ह्यातील नागरिकांचे काम सोपे व्हावे याकरिताच हे कार्यालय असून त्यानुसार सेवा दिली जात आहे.- सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय वर्धा.