शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:35 IST

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यात केवळ ७४.९७ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळीच पाऊस न आल्यास याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ८८९.४० मिमी, सेलू तालुक्यात ९५९.६२ मिमी, देवळी तालुक्यात ९५९.६२ मिमी, हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मिमी, समुद्रपूर १००१.६२ मिमी, आर्वी तालुक्यात ८५०.३० मिमी, आष्टी तालुक्यात ८६४.७२ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ८६४.७२ मिमी पाऊस पडतो. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. परंतु, १ ते १५ जून या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यात वर्धा तालुक्यात १६३.८० मि. मी. सेलू १८३.९० मिमी, देवळी तालुक्यात १८३.९० मिमी, हिंगणघाट तालुक्यात १५८.६० मिमी, समुद्रपूर १८३.५० मिमी, आर्वी तालुक्यात १५४.१० मिमी, आष्टी तालुक्यात १७१.७० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १७१.७० मिमी पाऊस पडतो; पण मागील काही दिवसात वादळीवाऱ्यासह नाममात्र झालेल्या पावसाने अनेकांच्या अडचणीत भरच टाकली. असे असले तरी पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांना तर भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.६० टक्के आटोपली कपाशीची लागवडअल्लीपूर : परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ग्रामीण भागातील शिरूड, सिरसगाव, पवनी, अलमडोह, टाकळी दरणे, येरणवाडी, पिंपळगाव भागात कपाशी व तूर लागवड जवळपास ६० टक्के पूर्ण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्यावरच लागवडीचा निर्णय घेतला आहे. रोहणी नक्षत्रात दमदार पाऊस न पडल्याने वाही न करताच शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर करून जमीन तयार केली. शिवाय, लागवड केली. काही भागात तुरळक पाणी झाल्याने कपासी लागवड वाया गेल्या आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडा होत आहे; मात्र पाऊसच रूसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागीलवर्षी यावेळी डवरणी, खुरपणीच्या कामाला गती दिली जात होती. तर यंदा विपरित चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Rainपाऊस