शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:35 IST

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यात केवळ ७४.९७ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळीच पाऊस न आल्यास याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ८८९.४० मिमी, सेलू तालुक्यात ९५९.६२ मिमी, देवळी तालुक्यात ९५९.६२ मिमी, हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मिमी, समुद्रपूर १००१.६२ मिमी, आर्वी तालुक्यात ८५०.३० मिमी, आष्टी तालुक्यात ८६४.७२ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ८६४.७२ मिमी पाऊस पडतो. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. परंतु, १ ते १५ जून या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यात वर्धा तालुक्यात १६३.८० मि. मी. सेलू १८३.९० मिमी, देवळी तालुक्यात १८३.९० मिमी, हिंगणघाट तालुक्यात १५८.६० मिमी, समुद्रपूर १८३.५० मिमी, आर्वी तालुक्यात १५४.१० मिमी, आष्टी तालुक्यात १७१.७० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १७१.७० मिमी पाऊस पडतो; पण मागील काही दिवसात वादळीवाऱ्यासह नाममात्र झालेल्या पावसाने अनेकांच्या अडचणीत भरच टाकली. असे असले तरी पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांना तर भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.६० टक्के आटोपली कपाशीची लागवडअल्लीपूर : परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ग्रामीण भागातील शिरूड, सिरसगाव, पवनी, अलमडोह, टाकळी दरणे, येरणवाडी, पिंपळगाव भागात कपाशी व तूर लागवड जवळपास ६० टक्के पूर्ण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्यावरच लागवडीचा निर्णय घेतला आहे. रोहणी नक्षत्रात दमदार पाऊस न पडल्याने वाही न करताच शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर करून जमीन तयार केली. शिवाय, लागवड केली. काही भागात तुरळक पाणी झाल्याने कपासी लागवड वाया गेल्या आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडा होत आहे; मात्र पाऊसच रूसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागीलवर्षी यावेळी डवरणी, खुरपणीच्या कामाला गती दिली जात होती. तर यंदा विपरित चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Rainपाऊस