शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:35 IST

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यात केवळ ७४.९७ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळीच पाऊस न आल्यास याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ८८९.४० मिमी, सेलू तालुक्यात ९५९.६२ मिमी, देवळी तालुक्यात ९५९.६२ मिमी, हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मिमी, समुद्रपूर १००१.६२ मिमी, आर्वी तालुक्यात ८५०.३० मिमी, आष्टी तालुक्यात ८६४.७२ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ८६४.७२ मिमी पाऊस पडतो. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. परंतु, १ ते १५ जून या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यात वर्धा तालुक्यात १६३.८० मि. मी. सेलू १८३.९० मिमी, देवळी तालुक्यात १८३.९० मिमी, हिंगणघाट तालुक्यात १५८.६० मिमी, समुद्रपूर १८३.५० मिमी, आर्वी तालुक्यात १५४.१० मिमी, आष्टी तालुक्यात १७१.७० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १७१.७० मिमी पाऊस पडतो; पण मागील काही दिवसात वादळीवाऱ्यासह नाममात्र झालेल्या पावसाने अनेकांच्या अडचणीत भरच टाकली. असे असले तरी पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांना तर भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.६० टक्के आटोपली कपाशीची लागवडअल्लीपूर : परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ग्रामीण भागातील शिरूड, सिरसगाव, पवनी, अलमडोह, टाकळी दरणे, येरणवाडी, पिंपळगाव भागात कपाशी व तूर लागवड जवळपास ६० टक्के पूर्ण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्यावरच लागवडीचा निर्णय घेतला आहे. रोहणी नक्षत्रात दमदार पाऊस न पडल्याने वाही न करताच शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर करून जमीन तयार केली. शिवाय, लागवड केली. काही भागात तुरळक पाणी झाल्याने कपासी लागवड वाया गेल्या आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडा होत आहे; मात्र पाऊसच रूसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागीलवर्षी यावेळी डवरणी, खुरपणीच्या कामाला गती दिली जात होती. तर यंदा विपरित चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Rainपाऊस