शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव हळदी'चा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:33 IST

Wardha : हळद प्रक्रिया, निर्यातीला मिळणार चालना, शेतकऱ्यांना होणार याचा चांगला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुर्कुमीनचे सर्वाधिक प्रमाण असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळदीला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. शासन व प्रशासन स्तरावरून वायगाव हळदीचा विस्तार, प्रक्रिया व निर्यात व्यवस्था उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून वायगाव हळदीला जागतिक बाजार पेठ उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागाला प्रकल्प आराखडा निर्मिती व अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे वायगाव हळदीचा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला होणार आहे. 

सन २०१६-१७ मध्ये या आर्थिक वर्षात वायगाव हळद उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे समभाग धारक यांच्याकडून उत्पादित केलेल्या सेंद्रिय हळदीला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत मासाला विक्री करण्यासाठी हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ९० टक्के अनुदानावर थेट डिबीटीद्वारे खरेदी होणार आहे.

थेट हळद उत्पादक शेतकरी शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, शेती संबंधित कार्य करणारी सहकारी संस्थ्या यांच्या स्तरावर हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था थेट डीबीटी पद्धतीने खरेदीबाबतचा प्रस्ताव तीन कोटी ११ लाख २४ हजार रुपये, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांचा १० टक्के स्वहिस्ता रक्कम अशी ३१ लाख २१ हजार रुपये ९० व टक्के अनुदान हिस्सा अशा ३ कोटी ११ लाख २४ हजार रुपयांच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

वायगाव हळदीला जीआय टॅग प्राप्तसन २०१७-१५ आत्मा कार्यालय व वायगाव हळद उत्पादक संघ यांच्या प्रयत्नातून वायगाव हळदेला भौगोलिक निर्देशांक जीआय प्राप्त झाले आहे. त्यामुळे वायगाव हळदीला चांगले दिवस प्राप्त झाले आहे. भौगोलिक निर्देशांक केल्यामुळे निर्यात करण्यासाठी अडचणी दूर झालेल्या असून बहुतांश शेतकरी कुटुंबाच्या जीवनात है पिक सोनेरी दिवस दाखविणारे ठरले आहे.

ब्रिटिश काळापासून हळदीची लागवडसमुद्रपूर तालुक्यातील हळद पीक ब्रिटिश काळापासून घेतले जात आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या हळदेची जोपासना अजूनही केली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पीकवल्या जाणाऱ्या य हळदीला जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातूनही अधिक मागणी आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFarmerशेतकरी