शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

पाण्याअभावी योजनांची उपयोगिता शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:19 IST

शहर विकासाचा वेग काहीसा मंद असला तरी निधीचा सुकाळ आहे. शहर विकासासाठी विशेष निधी म्हणून १० कोटी, अमृत योजनेला ६२ कोटी, नदीवर उड्डान-पुलाकरिता २० कोटी तर शहर विकासासाठी २० कोटी मिळणार, ही घोषणा झाली.

ठळक मुद्देनवीन बंधाºयाची गरज : साठवण क्षमतेअभावी होणार समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहर विकासाचा वेग काहीसा मंद असला तरी निधीचा सुकाळ आहे. शहर विकासासाठी विशेष निधी म्हणून १० कोटी, अमृत योजनेला ६२ कोटी, नदीवर उड्डान-पुलाकरिता २० कोटी तर शहर विकासासाठी २० कोटी मिळणार, ही घोषणा झाली. ही बाब शहरासाठी सुखावह असली तरी पाण्याअभावी हा विकास शून्यच दिसणार आहे. पाणी साठविण्यासाठी बंधाराच नसल्याने पिण्यासाठी तरी पाणी मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जलसंचय वाढावा म्हणून वणा नदीवर नव्या बंधाºयाची गरज आहे. पाण्यासाठी दीर्घकालीन योजना आखून बंधाºयाची निर्मिती गरजेची आहे. अन्यथा पाणी समस्या उग्र रूप धारण करणार आहे. नगर पालिकेकडे सध्या पाण्याच्या जुन्या टाक्या आहे. अमृत योजनेंतर्गत १० पाण्याच्या टाक्या नव्याने बांधणार आहे. हे काम सुरू आहे. नवीन पाईपलाईन, पम्पिंग स्टेशन, जलशुद्धीकरण प्रकल्प ही सर्व सुविधा उपलब्ध होत असून काम सुरू आहे; पण नदीत पाणीच साठत नसल्याने यंत्रणेचा उपयोग शून्य आहे. जलसंचय करणारी यंत्रणा, पालिकेकडे नसल्याने उन्हाळ्यात टंचाई जाणवते. जुना बंधारा वादग्रस्त असल्याने त्यात आणखी किती वेळ घालविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवीन बंधारा बांधायचा झाल्यास दोन-तीन वर्षे लागतील. यामुळे पुन्हा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. टंचाईची स्थिती लक्षात घेत जुन्या वादग्रस्त बंधाºयाकडे दुर्लक्ष करीत नवीन बंधाºयाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. यावर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे.पूर्वीचे प्रकरण न्यायप्रविष्टजलसंचयाकरिता वणा नदीवर बंधारा प्रस्तावित होता. बंधाºयाचे बांधकामही सुरू करण्यात आले होते. यात संपूर्ण निधी खर्ची घालण्यात आला; पण बंधारा पूर्ण झाला नाही. बंधाºयाचा काही भाग पुरात वाहून गेला. अनेकांनी हा निकृष्ट असल्याचा आरोप केला व प्रकरण न्यायालयात प्रविष्ट झाले. यावर निकालही लागला. हे घडल्यानंतरही बंधारा पूर्ण झाला नाही. आता पाणी संग्रहणासाठी हा बंधारा पूर्ण करणार की दुसरा बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बंधारा का गरजेचापाणीटंचाई जाणवत असल्याने पालिकेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपये खर्च करुन १.५ दशलक्ष घनमीटर पाणी घेतले. यामुळे त्यावेळी पाणीसाठा होता. या पाणी साठ्याने त्यावर्षी भागले. शहराला पाण्याचे दुर्भीक्ष जाणवले नाही. २०१७ च्या उन्हाळातही पाणीटंचाई जाणवल्याने वणा नदीला तीन वेळा पाणी देण्यात आले. यावरून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असल्याने बंधारा गरजेचा आहे.