शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीएम किसान'चे अपडेट् केले; ७० वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:58 IST

Vardha : शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. मात्र, याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेचे खाते अपडेट करा, म्हणून लिंकचा मेसेज येतो, आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत. त्यामुळे या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आपले खाते अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का तपासा, तुमचा अडकलेला हप्ता मिळवा, अशा एक ना अनेक प्रकारच्या मेसेजमधून अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये अप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होऊन बंद पडते. अशा प्रकारे फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या लिंकपासून वेळीच सावध व्हावे, कोणतेही मेसेज आणि लिंक आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. 

ई-केवायसीच्या नावे फसवणूक पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ई-के- वायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कॉल, मेसेज किंवा कोणतीही अनोळखी लिंक आली असेल तर चुकून ही त्यावर क्लिक करु नका, अन्यथा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करु शकतात.

काय काळजी घ्याल ? या योजनेंतर्गत अनेक शेतकरी आहेत ज्यांना मागील हप्त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. यामागे कारणे असू शकतात. मात्र, जर कुणी तुम्हाला हप्ता मागितला आणि त्याबदल्यात तुमच्याकडून पैसे घेतले तर तुम्ही सावध व्हा, कारण असे लोक तुमच्याकडून पैसे घेतात. आपली गोपनीय बैंकिंग माहिती देणे टाळा. तरच अशा फसवणुकीपासून तुम्ही वाचाल.

सायबरकडे नऊ महिन्यांत ८० वर तक्रारीजानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधी पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तब्बल ८० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, तर काहींची किरकोळ स्वरुपात रक्कमही गेल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. मात्र, ही फसवणूक सध्या वाढतच चालली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीwardha-acवर्धा