शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By admin | Updated: February 28, 2017 01:14 IST

वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित मागण्यांसाठी केवळ आश्वासनांची खैरातसमुद्रपूर : वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्यांकरिता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.ग्रामरोजगार सेवकांना इतर राज्यांप्रमाणे शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे. ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे. ग्रामरोजगार सेवक यांचे त्यांच्या गावापासून ५ किमीपर्यंत स्थलांतरण करण्यात यावे. ग्रामरोजगार सेवकाचे वेतन त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात यावे आदी मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेसमोर ग्रामरोजगार सेवकांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ५ ग्रामरोजगार सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटी स्थिती पाहून रोहयो आयुक्तालयाचे अधिकाऱ्यांनी भेट देत डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण मागण्या निकाली काढू, असे आश्वासन दिले होते; पण फेबु्रवारी २०१७ संपत असताना मागण्यांवर विचार झाला नाही. अधिकाऱ्यांनी केवळ आंदोलन संपविण्यासाठी तर आश्वासन दिले नाही ना, अशी शंका ग्रामरोजगार सेवकांत निर्माण झाली. परिणामी, पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले. १५ फेबु्रवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले. तत्सम निवेदन गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना देण्यात आले. यावेळी संदीप झाडे, निखील गुरनूले, मनोहर मसराम, पद्माकर कोटमकर, शुद्धोधन शेळके, सतीश ताकसांडे, प्रतापसिंग चौव्हान आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)आंदोलन संपविण्यासाठीच दिले होते आश्वासनप्रलंबित मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी जिल्हा परिषदेसमोर नोव्हेंबर २०१६ मध्ये उपोषण केले. यात पाच उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविले होते. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळ गाठत आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्यास बाध्य केले; पण त्यावर कारवाई झाली नाही. यामुळे आंदोलन संपविण्यासाठी आश्वासन दिल्याचा आरोप गामरोजगार सेवक करीत आहेत.