शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By admin | Updated: February 28, 2017 01:14 IST

वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित मागण्यांसाठी केवळ आश्वासनांची खैरातसमुद्रपूर : वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्यांकरिता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.ग्रामरोजगार सेवकांना इतर राज्यांप्रमाणे शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे. ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह १२ हजार रुपये वेतन देण्यात यावे. ग्रामरोजगार सेवक यांचे त्यांच्या गावापासून ५ किमीपर्यंत स्थलांतरण करण्यात यावे. ग्रामरोजगार सेवकाचे वेतन त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात यावे आदी मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेसमोर ग्रामरोजगार सेवकांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ५ ग्रामरोजगार सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटी स्थिती पाहून रोहयो आयुक्तालयाचे अधिकाऱ्यांनी भेट देत डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण मागण्या निकाली काढू, असे आश्वासन दिले होते; पण फेबु्रवारी २०१७ संपत असताना मागण्यांवर विचार झाला नाही. अधिकाऱ्यांनी केवळ आंदोलन संपविण्यासाठी तर आश्वासन दिले नाही ना, अशी शंका ग्रामरोजगार सेवकांत निर्माण झाली. परिणामी, पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले. १५ फेबु्रवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले. तत्सम निवेदन गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना देण्यात आले. यावेळी संदीप झाडे, निखील गुरनूले, मनोहर मसराम, पद्माकर कोटमकर, शुद्धोधन शेळके, सतीश ताकसांडे, प्रतापसिंग चौव्हान आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)आंदोलन संपविण्यासाठीच दिले होते आश्वासनप्रलंबित मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी जिल्हा परिषदेसमोर नोव्हेंबर २०१६ मध्ये उपोषण केले. यात पाच उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविले होते. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळ गाठत आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्यास बाध्य केले; पण त्यावर कारवाई झाली नाही. यामुळे आंदोलन संपविण्यासाठी आश्वासन दिल्याचा आरोप गामरोजगार सेवक करीत आहेत.