शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर बेरोजगाराची फसवणूक

By admin | Updated: May 17, 2015 02:36 IST

राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नोकरी देण्याच्या नावावर वर्धेतील एका युवकाला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे़ .

वर्धा : राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नोकरी देण्याच्या नावावर वर्धेतील एका युवकाला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणात सदर युवकाला एकूण २८ हजार ५५० रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. नितीन कांबळे, असे त्या युवकाचे नाव असून त्याने या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. युवकाने दिलेल्या निवेदनानुसार, ८ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून संजय शर्मा मॅनेजिंग डायरेक्टर, ट्रेनिंग मॅनेजर नामक व्यक्तीशी संपर्क साधला़ १० एप्रिल २०१५ रोजी सदर योजनेच्या कार्यालयातून निघालेले पत्र १६ एप्रिल २०१५ रोजी नितीन याला मिळाले़ राजीव गांधी जीवनदायी योजना केंद्र सरकारची योजना असल्याचे सांगण्यात आले होते; पण महाराष्ट्र सरकारचे गोविंद शिंदे यांची त्या पत्रावर स्वाक्षरी आढळून आली़ नियुक्ती पत्र हाती आल्यावर प्रथम सेक्युरिटी बाँड म्हणून त्या युवकाला ११ हजार ३०० रुपये बँक खात्यात भरावयास सांगण्यात आले़ सदर युवकाने ती रक्कम जमा केली़ यानंतर कोर्ट अ‍ॅग्रीमेंटच्या नावाखाली १७ हजार २०० जमा करण्यास सांगण्यात आले़ हा संपूर्ण व्यवहार दिल्ली कार्यालयाच्या संजय शर्मा पत्ता २५१/बी, राजीव गांधी रोड, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्सच्यासमोर यावर झाला. यानंतर आपणास नोकरी मिळणार, अशी नितीनला खात्री पटली; पण तसे झाले नाही़दुसऱ्या दिवशी संजय शर्मा यांनी पुन्हा भ्रमणध्वणीवर संपर्क साधला़ यावेळी ४ लाख ४० हजार रुपयांचा विमा धनादेश निघाला आहे. त्यासाठी २२ हजार रुपये भरावे लागणार असल्याची बजावणी केली़ सायंकाळपर्यंत कंपनीचे अधिकारी तुमच्या घरी येतील व तुमची प्रशिक्षणाची तारीख व सेवेचे कार्यालय निश्चित करतील, असेही सांगण्यात आले. पुन्हा रक्कम भरण्यास सांगितल्याने संशय आला़ यामुळे त्यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी फोन बंद केला. इतकेच नव्हे तर त्या दिवसानंतर दिलेल्या क्रमांकावर कधीही ‘कॉल कनेक्ट’ झाला नाही़ फोनवर सांगितल्यानुसार घरीही कुणी आले नाही़ यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच त्याने सदर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. अधीक्षकांच्या सांगण्यावरून शहर पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले़ राजीव गांधी जीवनदायी ही रुग्णांना सेवा व औषधोपचाराचा खर्च पुरविणारी योजना आहे़ यात शासनाकडून संबधित रुग्णालयांनाच खर्च दिला जातो़ असे असताना परराज्यातील काही भामटे त्यांचा नागरिकांची फसवणूक करण्याकरिता वापर करीत असल्याचे या प्रकरणावरून उघड झाले आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सदर युवकाने केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)भ्रमणध्वनीवर लुबाडणारे सक्रियनोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणारे सक्रिय झाले आहेत़ यातही काही भामटे भ्रामक जाहिरातींच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करीत असून भ्रमणध्वनीचा वापर करून त्यांची लुबाडणूक करीत आहेत़ राजीव गांधी जीवनदायी योजनेत नोकरीचे आमिष देऊन लुटण्याच्या या प्रकारातही एखादी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे़ यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत़ काही नामांकित कंपन्यांच्या नावावर लहान कार्यालय थाटून बेरोजगारांची लूट करीत असल्याचे प्रकार उघड झाले आहे़ शिवाय आपला मोबाईल शॉर्टलिस्ट झाल्याचे सांगून कोट्यवधीचे बक्षिस लागल्याचे सांगून लूट केली जात आहे़ बेरोजगार युवकांनी यापासून सावध राहणे गरजेचे झाले आहे़