शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४०१ परिचालकांवर बेरोजगारीचे संकट

By admin | Updated: September 10, 2015 02:42 IST

ग्रामपंचायतचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.

गौरव देशमुख वर्धाग्रामपंचायतचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग असलेल्या ई-पंचायत (संग्राम) योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, प्रिंटर, युपीएस असे साहित्य देण्यात आले. याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. शासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना केलेल्या कराराला मुदतवाढ देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील ४०१ संगणक परिचालक बेरोजगारीच्या वाटेवर आहेत.कर्मचाऱ्यांसोबतचा असलेला करार ३१ मार्च २०१५ ला संपणार होता. याला सहा-सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याकरिता १३ व्या वित्त आयोगातील उर्वरित निधीच्या वापरण्याची संमती राज्य शासनाने दिली होती. ३० सप्टेंबर २०१५ ला ही मुदत संपत आहे. त्यामुळे ४३३ ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर योजना महाआॅनलाईन कंपनीशी जोडण्यात आली आहे. योजनेवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख ठेवली जाते. या साहित्याकरिता शासनाने कंपनीसोबत करार केला होता. जिल्ह्यात या योजनेवर कोट्यवधीचा खर्च झाला; पण कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. या योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शासनासोबत असलेला करार महिन्याअखेर संपत आहे. अद्याप कुठलेही ठोस पाऊस उचलेले गेले नसल्याची माहिती संगणक परिचालकांनी सांगितली. जिल्ह्यात ई-पंचायत योजनेमध्ये सरासरी ४३३ कर्मचारी कार्यरत आहे. यात दरमहा कामानुसार कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी-अधिक होत असते. यात ४०१ संगणक परिचालक आहेत. यात सात तालुका समन्वयक, हार्डवेअर इंजिनिअर ९ तर पंचायत समिती परिचालक १६ अशी एकूण संख्या ४३३ आहे; पण या महिन्याच्या अखेर आॅनलाईन कंपनीमार्फत केलेला कर्मचाऱ्यांचा करार संपत असल्याने ते कर्मचारी विवंचनेत आहे. यावर तोडगा काढून कामावर कायम ठेवण्याची मागणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ग्राम विकास विभागामार्फत यावर उपाययोजना करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा उपासमारीची शक्यता वाढली आहे. याबाबत कार्यवाहीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.