शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

बेरोजगारांना रोजगार मिळाला खरा, पण, दोन महिन्यांपासून पगार थांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 17:08 IST

लाडक्या भावांची व्यथा : जिल्ह्यात १३७५ बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने लाडका भाऊ योजना सुरू केली. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात एक हजार ३७५ बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यात आला; मात्र रोजगार मिळाला त्या दिवसांपासून अनेकांना पगारच मिळाला नाही. गत दोन महिन्यांपासून पगार थांबला असल्याची व्यथा लाडक्या भावांनी बोलून दाखविली आहे.

जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लाखांत आहे. त्यात नोंदणी केलेल्यांचा आकडा मोठा आहे. शासनाच्या राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. यात शैक्षणिक अर्हतेनुसार १२ वी ते पदव्युत्तर असणाऱ्या बेरोजगार युवकांना ६ ते १० हजार रुपये मानधन तत्त्वावर जिल्ह्यात विविध क्षेत्रातील प्रकल्प, स्टार्टअप विविध आस्थापना येथील रिक्त असलेल्या जागांवर बेरोजगारांची नियुक्ती करण्यात आली. यात जिल्ह्यात शासकीय कार्यालयात आस्थापनांवर तब्बल १ हजार १२९ जणांना नियुक्ती देण्यात आली; मात्र यापैकी बहुतेक जणांचे गत दोन महिन्यांपासून वेतन थांबलेलेच आहे 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नियुक्त ३० युवकांना २ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेचा मोठा गाजावाजा केला; मात्र योजना राबविताना नियोजनाचा अभाव असल्याने याचा फटका प्रशिक्षणार्थी युवकांना बसत असल्याचे वास्तव जिल्ह्यात समोर येत आहे.

खर्च कमी किती करणार कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. योजनेतून रोजगार मिळावा म्हणून कार्यालयाच्या चकरा मारल्या. रोजगार मिळाला; मात्र पहिल्या दिवसांपासूनचे अजूनपर्यंत वेतन झाले नाही. जेवणाचा खर्च, रुमचा खर्च, घरूनच करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून बाहेर चहा, नाश्ता बंद केला. खर्च कमी करून किती करणार, वाहनासाठी दुचाकी पेट्रोल, जेवणाचा खर्च आदी तर द्यावाच लागतो अशी भावना लाडक्या भावांकडून व्यक्त केली जात आहे.

पगार सहा हजार अन् खर्च तीन हजारनियुक्त करण्यात आलेल्या बेरोज- गारांना पूर्णवेळ कामासाठी १२ वी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या ६ हजार रुपये मानधन देण्यात येते. विभाग नियंत्रक कार्यालयात एक दिव्यांग नियुक्त करण्यात आला आहे. त्याला दुचाकीही चालविता येत नसल्याने रोज वर्धा ते सेवाग्राम असा २० रुपये आणि वर्धा ते घर २० असा ४० रुपये खर्च एका वेळेला त्याला येत आहे. दिवसाला त्याला ८० रुपये खर्च येतो आहे. महिन्याकाठी अडीच हजार त्याचे प्रवासावर खर्च होत असून खर्च वगळता त्याच्या हातात केवळ साडेतीन हजार येणार आहे. भविष्यात नोकरी कायम राहील, केवळ या आशेवर तो काम करीत असल्याचे सांगण्यात आले. 

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून रोजगार देण्यात आलेल्यांचे जवळपास ८० टक्के वेतन अदा करण्यात आले आहे. १० टक्के प्रक्षिक्षणार्थीचे वेतन प्रक्रियेत आहे. तर बँकेच्या अडचणींमुळे १० टक्के प्रशिक्षणार्थीचे वेतन अडले आहे." - नीता अवघड, सहायक आयुक्त कौशल्य विभाग.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना