शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

एक किमी रस्त्याच्या बांधकामातही गैरप्रकार

By admin | Updated: September 8, 2015 04:21 IST

गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची

अल्लीपूर : गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची दुरूस्ती, रस्ता दुभाजक व नाली सौंदर्यीकरण ही कामे १ कोटी ९० लाख रुपयांत प्रस्तावित होती. या कामाला ३० आॅगस्टपासून सुरूवात झाली. यात गैरप्रकार होत असून बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कामाच्या चौकशीची मागणीही होत आहे.इस्टीमेट प्रत न देता व ग्रा.पं. ला विश्वासात न घेता काम सुरू आहे. या कामाची खोली ३७ से.मी. असताना केवळ ३० से.मी. करण्यात येत आहे. रस्त्याचे रूंदीकरण करताना ५० टक्के माती मिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. दुसऱ्या कोटसाठी चार एमएम गिट्टी ही चार मिटरऐवजी एक ते दीड मीटर टाकली जात आहे. उर्वरित दीड मिटरमध्ये माती, मुरूम टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित अभियंता आचार्य व मुख्य अभियंता कुहीकर यांना सूचना दिली. यावरून ग्रामस्थांसमोर पाहणी करून माती मिश्रीत गिट्टी वापरण्यावर बंदी करण्यात आली. माती मिश्रीत गिट्टी काढण्याच्या सूचनाही दिल्या; पण कंत्राटदार कापसे यांनी निकृष्ट काम सुरूच ठेवले. याबाबत माजी ग्रा.पं. सदस्य श्रीराम साखरकर, उपसरपंच रामा धनवीज, ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे तुळशिराम साखरकर, किसना लोणारे, सतीश काळे व ग्रामस्थांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट काम बंद करण्याचा इशारा दिला. याबाबत बांधकाम विभाग, पोलिसांत तक्रार देण्यात आली.(वार्ताहर)नियमातच काम होईल- बांधकाम विभाग४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून रस्ता दुरूस्ती, दुभाजक व सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. याचे कंत्राट देवळी येथील कंत्राटदारास दिले असून तो निकृष्ट कामे करीत आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. याबाबतच्या तक्रारीवरून पाहणी झाली. यात माती मिश्रीत मुरूम, गिट्टी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या; पण कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी रोडच्या मटेरियलचे सॅम्पल घेऊन परिक्षणासाठी पाठवावे. माझी हकरत नाही. थोडे निकृष्ट काम करून मी माझी पत घालवू शकत नाही.- पांडुरंग कापसे, कंत्राटदार, देवळी.४बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कुहीकर यांना विचारणा केली असता जे काम सुरू आहे ते योग्यच होईल. इस्टीमेट नुसारच काम होईल. जेथे माती काम केले ते खोदून नव्याने योग्य काम करण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता सदर काम निकृष्ट दर्जाचेच होत आहे.- रामा धनविज, तक्रारकर्ता.सदर कामाबाबत ग्रा.पं. ला बांधकाम विभागाने माहिती दिली नाही. शिवाय ना-हरकत प्रमाणपत्रही मागितले नाही. - ए.व्ही. गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी.भविष्यात मुख्य रस्त्यासाठी एवढा निधी येणार नाही. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. इस्टीमेटनुसार काम व्हायला पाहिजे. मुरूमाऐवजी माती व चुरीऐवजी मुरूम वापरला जात आहे. - श्रीराम साखरकर, माजी ग्रा.पं. सदस्य.