शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना वीस लाखांचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:34 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.

ठळक मुद्देअवचितराव सयाम यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना लागू केली. ही योजना जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणाच्या काळात विम्याचे कवच मिळावे यासाठी ऑल इंडिया एससी, एसटी, ओबीसी असोसिएशनचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष अवचितराव सयाम यांनी पाठपुरावा केला. त्यांनी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात बँकांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जन-धन खात्यातील रक्कम काढणाऱ्या बँकेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये कोण कोरोनाग्रस्त असेल याचा अंदाज येत नाही. त्यातही कुणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल याचाही नेम नसल्याने शाखेत कार्यरत कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे तर कुठे मृत्यू झाल्याच्याही घटना घडत आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात देशाची आर्थिक बाजू अतिशय मजबूतपणे बँक कर्मचारी सांभाळत आहेत. केवळ मास्क व सॅनिटायझर लावून कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत पण, बँकेत दररोज होणाऱ्या गदीर्ने धोका आणखीच वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने बँक कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलसारखे ड्रेस व सुविधा पुरवावी, अशी मागणी ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया कर्मचारी असोसिएशनच्या विदर्भ विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBank of Indiaबँक ऑफ इंडिया