शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बसच्या तिहेरी अपघातात १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:51 IST

दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला.

ठळक मुद्देईसापूर शिवारातील अपघात : बस चालक व वाहक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. बसमधील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक व वाहक, हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, बस व दोन्ही मालवाहु ट्रक एकाच दिशेने नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. उमरेड डेपोची बस क्र. एमएच ४० वाय ५१६० ही यवतमाळमार्गे नागपूरकडे जात होती. दरम्यान, बसच्या मागाहून सोयाबीन घेऊन भरधाव येणाºया मालवाहू ट्रक क्र. एमएच २९ एमओ ५०८ ने बसला जबर धडक दिली. या धडकेमुळे अनियंत्रित झालेली बस समोर असलेल्या तुरीच्या ट्रक क्र. सीजी ०४ जेडी ९०३९ वर आदळली. या अपघातात बसच्या दोन्ही बाजूला जबर धडक बसल्याने बारा प्रवासी जखमी झाले. काही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविले.जखमींमध्ये गायत्री धोटे व गणेश देशकर रा. देवळी, विशाल वाघाडे व चंद्रकला मारोती गिरी रा. कळंब, तुफान जाधव आर्णी, बेबी भोळे कामरवाडा, मयूरी कुथे नेरी, भारती माने हिवरा, नारायण पारिसे तांबा, कुसूम नागरे यवतमाळ, श्रीकृष्ण पेंदाम व पुनम बर्धिया वातोडा यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते. लोकांनी जखमींना खासगी, सरकारी वाहनाने रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नेमकी उकल झाली नसल्याने पोलिसांनी अंदाजे घटनाक्रम विषद केला. जखमींचे बयाण व चौकशी अंती गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात