शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त अडचणीत

By admin | Updated: March 12, 2015 01:38 IST

प्रकल्प निर्मिती करणार म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पाचे काम रखडले असल्याने गोजी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वावाहाचा प्रश्न आवासून उभा आहे.

वर्धा : प्रकल्प निर्मिती करणार म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पाचे काम रखडले असल्याने गोजी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वावाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. यातच शासनाने जमिनीही अल्प भाव देऊन संपादित केल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना पूर्ववत परत कराव्या, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहेत. लघुपाटबंधारे विभाग वर्धा जिल्हा यांनी प्रस्तावित असलेल्या गोजी प्रकल्पाकरिता परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र या कामाला अद्याप प्रारंभ झाला नाही. गोजी-येसंबा येथे २००३-०४ मध्ये प्रकल्प प्रस्तावित होता. यानुसार एसंबा व गोजी येथील शेतकऱ्यांच्या १५०० एकर जमिनी संपादित करण्यात आल्या. हा परिसर सुपिक व सिंचित होणार हे आता तर स्वप्नच ठरणार आहे असे दिसते. यात जमिनीला एकरी २८ हजार रूपये देण्यात आला. प्रत्यक्षात बाजारभाव प्रति एकर ४ लाख रूपये असा होता. शासनाने अल्प भावाने जमिनी प्राप्त प्रकल्पही केला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात सिंचनाची सोय व्हावी, उत्पन्न वाढावे यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पाकरिता जमिनी दिल्या. पण ज्या प्रकल्पाच्या आशेने जमिनी दिल्या त्याचे मागील बारा वर्षांपासून भूमीपूजनही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या आशा आता मावळल्या आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाला निवेदन सादर करताना शिष्टमंडळात माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष संजय काकडे, गोजीचे माजी सरपंच गजानन हायगुणे, माजी जि.प. अध्यक्ष शशांक घोडमारे, हातीम बाबू, नाना कापसे, नाना अनकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावर कोणताच निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)