शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त अडचणीत

By admin | Updated: March 12, 2015 01:38 IST

प्रकल्प निर्मिती करणार म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पाचे काम रखडले असल्याने गोजी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वावाहाचा प्रश्न आवासून उभा आहे.

वर्धा : प्रकल्प निर्मिती करणार म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र प्रकल्पाचे काम रखडले असल्याने गोजी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वावाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. यातच शासनाने जमिनीही अल्प भाव देऊन संपादित केल्या आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना पूर्ववत परत कराव्या, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहेत. लघुपाटबंधारे विभाग वर्धा जिल्हा यांनी प्रस्तावित असलेल्या गोजी प्रकल्पाकरिता परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र या कामाला अद्याप प्रारंभ झाला नाही. गोजी-येसंबा येथे २००३-०४ मध्ये प्रकल्प प्रस्तावित होता. यानुसार एसंबा व गोजी येथील शेतकऱ्यांच्या १५०० एकर जमिनी संपादित करण्यात आल्या. हा परिसर सुपिक व सिंचित होणार हे आता तर स्वप्नच ठरणार आहे असे दिसते. यात जमिनीला एकरी २८ हजार रूपये देण्यात आला. प्रत्यक्षात बाजारभाव प्रति एकर ४ लाख रूपये असा होता. शासनाने अल्प भावाने जमिनी प्राप्त प्रकल्पही केला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात सिंचनाची सोय व्हावी, उत्पन्न वाढावे यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पाकरिता जमिनी दिल्या. पण ज्या प्रकल्पाच्या आशेने जमिनी दिल्या त्याचे मागील बारा वर्षांपासून भूमीपूजनही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या आशा आता मावळल्या आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाला निवेदन सादर करताना शिष्टमंडळात माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष संजय काकडे, गोजीचे माजी सरपंच गजानन हायगुणे, माजी जि.प. अध्यक्ष शशांक घोडमारे, हातीम बाबू, नाना कापसे, नाना अनकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावर कोणताच निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)