शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षी कारभारामुळे होतो मनस्ताप

By admin | Updated: May 10, 2017 00:48 IST

हिंगणघाट येथील कोचर वार्ड भागातील रहिवासी सचिन बळबंत धारकर यांनी बाबुजी मोटर्स हिंगणघाट याच्या

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हिंगणघाट येथील कोचर वार्ड भागातील रहिवासी सचिन बळबंत धारकर यांनी बाबुजी मोटर्स हिंगणघाट याच्या मध्यस्तीने नवीन दुचाकी विकत घेतली. परंतु, गत महिन्याभऱ्यापासून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने त्यांच्या नवीन दुचाकीची नोंदणीच करण्यात आली नाही. परिणामी, त्यांना स्थायी क्रमांकासाठी चांगलीच माथापच्छी करावी लागली. दरम्यानच्या काळात त्यांना वाहनावर क्रमांक नसल्याच्या कारणाने दोन वेळा वाहतूक पोलिसांनी चलान दिले. क्रमांकाबाबत विचारणा केली असता दुचाकी विक्रेत्यासह उपप्रादेशिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही उडवा-उडवीचे उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तेथील कर्मचाऱ्यांकडून नेहमीच उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महिना लोटूनही वाहनांची नोंदणी होत नसल्याने व नवीन वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. उडवा-उडवीचे उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. सचिन धारकर यांनी २८ मार्चला बाबुजी मोटर्स हिंगणघाट यांच्या मध्यस्तीने सुरूवातीला थोडीफार रोकड देत त्यांनी कर्ज घेत नवीन दुचाकीची खरेदी केली. सुरूवातीला त्यांना दुचाकीसाठी तात्पूर्ता क्रमांक देण्यात आला. परंतु, दुचाकीवर लावलेले कागदी स्टीकर अल्पावधीतच गळून पडले. आठ दिवसांचा कालावधी लोटल्याने त्यांनी स्थायी क्रमांक आला काय याची विचारणा असता लवकरच क्रमांक मिळेल असे सांगण्यात आले. बराच कालावधील लोटूनही दुचाकीसाठी स्थायी क्रमांक मिळाला नसल्याने त्यांनी वर्धा येथील अधिकृत दुचाकी विक्रेत्याचे कार्यालय गाठले. विचारा केली असता दुचाकीचा क्रमांक अद्यापही मिळाला नाही, असे धारकर यांना सांगण्यात आल्याचे धारकर सांगतात. धारकर यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय गाठून विचारा केली असता कर्मचाऱ्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याचे धारकर यांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षी कारभारामुळे धारकर यांना दोन वेळा वाहनावर क्रमांक नसल्याने कारण दाखवत चलान देण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.