शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

गोंडी गीतांनी उजाडली आदिवासी पहाट

By admin | Updated: April 27, 2016 02:23 IST

आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून

अजय मसराम यांच्या गीतांची मैफल : गाण्यांमधून केले ज्वलंत प्रश्नांवर भाष्यवर्धा : आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेला गोंडीबोलीचे जणू वरदान लाभले आहे. समृद्ध वनसंपदेच्या सानिध्यात राहून टक्केटोणपे खाल्लेल्या म्हणजे संगीतशास्त्राच्या भाषेत रियाज पूर्ण झालेल्या गोंडीबोलीतून पारंपरिक गीतांचे सादरीकरण झाले की, कुणाचीही पावले थिरकायला लागतात. मात्र या थिरकण्याने आयुष्यातील अंधार दूर होणार नाही. त्याला प्रबोधनाचीच गरज आहे. याच जाणिवेतून नागपुरातील प्रसिद्ध आदिवासी गायक अजय मसराम यांच्या प्रबोधन गीतांची मैफल स्थानिक आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुलात रविवारी पहाटे आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर मडावी, जंगल कामगार सहकारी संस्थेचे बापूराव उईके, नगरसेवक शरद आडे, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव मडावी, वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष राजू मडावी, हरिदास टेकाम, चंद्रभान खंडाते व इतर मान्यवर उपस्थित होते. अजय मसराम यांनी या मैफलीत २५ गोंडीगीते सादर केली. आदिवासींची संस्कृती, बोलीभाषेचा ऱ्हास, शहरीकरणामुळे हरवलेली आदिवासी मुल्ये, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, राजकीय नेत्यांची खोटी आश्वासने, युवकांची व्यवसनाधिनता, वनकायद्यामुळे आदिवासींवर आलेल्या मर्यादा, पुनर्वसनाचे प्रश्न, कल्याण योजना राबविताना शासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई, आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वसमाजाकडेच केलेले दुर्लक्ष आदी विषयांवर अजय मसराम यांनी गोंडी गीतांच्या माध्यमातून प्रकाश टाकला. याशिवाय शहीद बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, वरी बाबूराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व पारीकुपार लिंगो यासारख्या पुरोगामी, परिवर्तनवादी महापुरूषांचे जीवनकार्य गीतांमधून सांगितले. शिक्षण घेऊन आधुनिक विचारांचा स्वीकार करा, मात्र संस्कृती विसरू नका, असे आवाहन मसराम यांनी केले. या प्रबोधन मैफलीला संगीत पुरकाम, रोहित बिसेन, गौरव किरनाके, रमेश युनाती, अरविंद मसराम, गोलू उईके, गजानन उईके, मनीष किरनाके यांनी संगीताची सुमधूर साथ दिली. प्रारंभी आयोजक राजू मडावी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल मोहन मसराम व उईके यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीचे चंद्रभान खंडाते, विजय म्हरस्कोल्हे, अशोक धुर्वे, मोहन मसराम, शंकर म्हरस्कोल्हे, नंदकिशोर बिसेन, राजेंद्र मसराम, द्वारका प्रसाद राऊत, राजेंद्र मडावी, केशव सयाम, केशव पुरके, दादा इवनाते, शंकर उईके, भरत कोवे, संजय कोहचडे, पुंडलिक परतेकी, सुनील सलामे, हरिहर पेंदामकर, सुनील मसराम, अशोक कोडापे, दिगंबर पेंदाम, किसन कौरती, ज्ञानेश्वर उईके, वर्षा टेकाम, गंगाधर उईके, विठ्ठल इवनाथे, सुखदेव आत्राम आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)