शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

वर्धा ते दिल्ली ‘महा-देव’ यात्रा आग्रा येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:05 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना घालणार साकडे १,१०० किमीचे अंतर कापले सायकलने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी ही सायकल यात्रा युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात काढण्यात आली असून यात्रेत सहभागी युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व अतिक्रमण धारक दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विविध मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी साकडे घालणार आहेत.सदर सायकल यात्रेत सहभागी तरुणांसह अतिक्रमण धारकांनी वर्धा, खडकी, नागपूर, सावनेर, जामसावळी, पांढुर्णा, मुलताई, बेतूल, शहापूर, होशंगाबाद, मंडदीप, साची, विधीशा, महळुवा, चंदेरी, दिणारा, ग्वालियर, मोरेना असा १७ दिवस सायकलने प्रवास करून उत्तरप्रदेशातील आग्रा गाठले आहे. १ हजार १०० किमीचे अंतर पूर्ण केल्यानंतर सुमारे ३०० किमीचे अंतर कापूर हे आंदोलनकर्ते केवळ वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अतिक्रमण धारकांच्या समस्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ते महाराष्ट्रातील गल्ली-गल्लीतील अतिक्रमण धारकांचा आवाज दिल्ली दरबारी बुलंद करणार आहेत. शिवाय ते ‘महा-देव’ यात्रेच्या माध्यमातून शासकीय जागेवर अतिक्रमणकरून राहणाऱ्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशीर ठाकरे, अमित शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत.

वयोवृद्धांसह महिलांचाही सहभागसेवाग्राम ते दिल्ली अशा सुमारे १ हजार ३०० किमीच्या ‘महा-देव’ यात्रेत पाच महिलांसह ६७ वर्षीय वयोवृद्ध आणि १५ वर्षीय बालक सहभागी झाला आहे. मिळेल तेथे रात्रीचा डेरा टाकून या आंदोलनकर्त्यांनी आग्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान काही सायकल स्वारांची प्रकृती खालावली होती. तर काही सायकल चालविताना अनियंत्रित होत जमिनीवर पडल्याने जखमीही झाले. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरून हे आंदोलनकर्ते आता दिल्ली गाठायचीच या दृढ निश्चय करून पुढील वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक