शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा ते दिल्ली ‘महा-देव’ यात्रा आग्रा येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:05 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना घालणार साकडे १,१०० किमीचे अंतर कापले सायकलने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी ही सायकल यात्रा युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात काढण्यात आली असून यात्रेत सहभागी युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व अतिक्रमण धारक दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विविध मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी साकडे घालणार आहेत.सदर सायकल यात्रेत सहभागी तरुणांसह अतिक्रमण धारकांनी वर्धा, खडकी, नागपूर, सावनेर, जामसावळी, पांढुर्णा, मुलताई, बेतूल, शहापूर, होशंगाबाद, मंडदीप, साची, विधीशा, महळुवा, चंदेरी, दिणारा, ग्वालियर, मोरेना असा १७ दिवस सायकलने प्रवास करून उत्तरप्रदेशातील आग्रा गाठले आहे. १ हजार १०० किमीचे अंतर पूर्ण केल्यानंतर सुमारे ३०० किमीचे अंतर कापूर हे आंदोलनकर्ते केवळ वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अतिक्रमण धारकांच्या समस्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ते महाराष्ट्रातील गल्ली-गल्लीतील अतिक्रमण धारकांचा आवाज दिल्ली दरबारी बुलंद करणार आहेत. शिवाय ते ‘महा-देव’ यात्रेच्या माध्यमातून शासकीय जागेवर अतिक्रमणकरून राहणाऱ्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशीर ठाकरे, अमित शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत.

वयोवृद्धांसह महिलांचाही सहभागसेवाग्राम ते दिल्ली अशा सुमारे १ हजार ३०० किमीच्या ‘महा-देव’ यात्रेत पाच महिलांसह ६७ वर्षीय वयोवृद्ध आणि १५ वर्षीय बालक सहभागी झाला आहे. मिळेल तेथे रात्रीचा डेरा टाकून या आंदोलनकर्त्यांनी आग्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान काही सायकल स्वारांची प्रकृती खालावली होती. तर काही सायकल चालविताना अनियंत्रित होत जमिनीवर पडल्याने जखमीही झाले. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरून हे आंदोलनकर्ते आता दिल्ली गाठायचीच या दृढ निश्चय करून पुढील वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक