शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

वर्धा ते दिल्ली ‘महा-देव’ यात्रा आग्रा येथे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:05 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांना घालणार साकडे १,१०० किमीचे अंतर कापले सायकलने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम बापूकुटी येथून २३ जुलैला दिल्लीकडे रवाना झालेली ‘महा-देव’ सायकल यात्रा सध्या उत्तरप्रदेशातील आग्रा येथे दाखल झाली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी ही सायकल यात्रा युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात काढण्यात आली असून यात्रेत सहभागी युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व अतिक्रमण धारक दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विविध मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी साकडे घालणार आहेत.सदर सायकल यात्रेत सहभागी तरुणांसह अतिक्रमण धारकांनी वर्धा, खडकी, नागपूर, सावनेर, जामसावळी, पांढुर्णा, मुलताई, बेतूल, शहापूर, होशंगाबाद, मंडदीप, साची, विधीशा, महळुवा, चंदेरी, दिणारा, ग्वालियर, मोरेना असा १७ दिवस सायकलने प्रवास करून उत्तरप्रदेशातील आग्रा गाठले आहे. १ हजार १०० किमीचे अंतर पूर्ण केल्यानंतर सुमारे ३०० किमीचे अंतर कापूर हे आंदोलनकर्ते केवळ वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अतिक्रमण धारकांच्या समस्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ते महाराष्ट्रातील गल्ली-गल्लीतील अतिक्रमण धारकांचा आवाज दिल्ली दरबारी बुलंद करणार आहेत. शिवाय ते ‘महा-देव’ यात्रेच्या माध्यमातून शासकीय जागेवर अतिक्रमणकरून राहणाऱ्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे करीत असून यात्रेत पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशीर ठाकरे, अमित शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत.

वयोवृद्धांसह महिलांचाही सहभागसेवाग्राम ते दिल्ली अशा सुमारे १ हजार ३०० किमीच्या ‘महा-देव’ यात्रेत पाच महिलांसह ६७ वर्षीय वयोवृद्ध आणि १५ वर्षीय बालक सहभागी झाला आहे. मिळेल तेथे रात्रीचा डेरा टाकून या आंदोलनकर्त्यांनी आग्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासादरम्यान काही सायकल स्वारांची प्रकृती खालावली होती. तर काही सायकल चालविताना अनियंत्रित होत जमिनीवर पडल्याने जखमीही झाले. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरून हे आंदोलनकर्ते आता दिल्ली गाठायचीच या दृढ निश्चय करून पुढील वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक