शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मालवाहू वाहनातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे.

ठळक मुद्देजीविताला धोका : एसटीची बसफेरीच नाही!

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील निंबोली गावात अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क मालवाहू चारचाकी वाहनातून उभ्याने प्रवास करून शैक्षणिकस्थळी जावे लागत असल्याचे चित्र आहे. यात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. यामुळे ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. या गावातून ३० ते ३५ विद्यार्थी पाचवी ते दहावीचे शिक्षण घेण्यासाठी जातात, तर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी २५ ते ३० विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र, गावात बसच येत नसल्याने मालवाहू वाहनातून नाईलाजाने जनावरासारखे उभ्यानेच शिक्षणासाठी जावे लागत आहे.६० टक्के शेती संपादिततालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील संपूर्ण घरे निम्न वर्धा प्रकल्पाने गिळंकृत केली. या गावकऱ्यांची ५० ते ६० टक्के शेतीही या धरणाकरिता संपादित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांचे आर्वी देऊरवाडा या मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले.वाहतुकीसाठी रस्ता व्यवस्थित नाही, हे खरे. मात्र, लहान वाहने मालवाहू गावात येतात. एसटी ला पावसाळ्यात रस्त्याची अडचण होते, हे ठिक आहे पण आता हिवाळा उन्हाळा असल्याने बसेस गावात न येण्यास काय अडचण आहे? नाईलाजाने जीव धोक्यात घालून मालवाहू गाडीतून जावे लागते. बसफेरी सुरू करण्यासाठी निवेदन ही दिले; मात्र केराी टोपली दाखविण्यात आली.- सुयोग शेंडे, (निंबोली) विद्यार्थी, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आर्वी.सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे दिवस आहे दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. पुढच्याच महिन्यात पाचवी ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा आहे. मात्र, अनेक महिन्यापासून बस गावात येत नसल्याने आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही. परिणामी मोठा त्रास होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा असून बस सुरू करण्याची रास्त मागणी आहे.- साक्षी संतोष हांडे (निंबोली), विद्यार्थीनी, मॉडेल हायस्कूल देऊरवाडा

टॅग्स :Studentविद्यार्थी