शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
2
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
3
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
4
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
5
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
6
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
7
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
8
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
9
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
10
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
11
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
12
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
14
Video: एका गाडीवर पाच तरुण, पोलिसांनी अशी घडवली अद्दल की पुन्हा हिंमत होणार नाही?
15
तुमच्या व्हॉट्सॲप, ईमेलवर आयकर विभागाची नजर? व्हायरल दाव्यामागचे सत्य आले समोर
16
Swiggy वर यावर्षी सर्वाधिक ऑर्डर झाला 'हा' पदार्थ; कंपनीला मिळाल्या ९.३ कोटी ऑर्डर्स
17
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
18
सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...?
19
PAN Adhaar News: नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी पॅन-आधारशी निगडीत 'हे' महत्त्वाचं काम पूर्ण करा, अन्यथा वाढेल टेन्शन
20
इस्रोचा 'बाहुबली' लाँच! जगातील सर्वात वजनदार उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-३ LVM3 रॉकेटवरुन प्रक्षेपित
Daily Top 2Weekly Top 5

सहा ठाणेदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:40 IST

जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ठाणेदारांपैकी पाच जणांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांची विनंती वरिष्ठांनी मान्य केली असून विनंतीत असलेल्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाच जणांची विनंती तर एकाचा झाला होता कार्यकाळ पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ठाणेदारांपैकी पाच जणांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांची विनंती वरिष्ठांनी मान्य केली असून विनंतीत असलेल्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. तर एका ठाणेदाराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.विनंती बदल्यात सध्या हिंगणघाट ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिरतोडे यांची बदली लोहमार्ग मुंबई येथे करण्यात आली. वर्धेतील दीपक सुखदेव साखरे यांना नागपूर शहर येथे पाठविण्यात आले. रामनगर ठाण्याचे निरीक्षक विजय मगर यांना अकोला येथे पाठविण्यात आले. तर आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांना सोलापूर ग्रामीण येथे बदली देण्यात आली. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांना नागपूर शहर येथे रवाना करण्यात आले.कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांत राजू बन्सी मेंढे यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली. जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण करणारा हा एकमेव अधिकारी असल्याचे जाहीर झालेल्या याद्यांमधून दिसून आले तर अकोला येथील प्रल्हाद किसनराव काटकर हे वर्धा पोलीस विभागात बदलून आले आहे. सोबतच नागपूर शहरचे सत्यवीर कुमार मारोतराव बंडीवार वर्धा पोलीस विभागात रूजू झाले आहे. जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून केवळ दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहे. यामुळे ठाणेदारांच्या रिक्त पदांचा अतिरिक्त भार जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खाद्यांवरच येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेत बदल्याचा फटकाजिल्ह्यात पोलीस विभागात पहिलेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे अनेकवेळा पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. यात एकाच वेळी पाच ठाणेदारांच्या विनंती बदल्या झाल्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे. शिवाय जिल्ह्यात नवे अधिकारीही आले नसल्याने कामांचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तत्काळ मुक्त करण्याचे आदेशबदली झालेल्या अधिकाºयांना दिलेल्या ठिकाणी तत्काळ रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेश आहेत. बदली झालेल्या कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदली झालेल्या जागेवर रूजू होण्याचे फर्मानही सोडण्यात आले आहे.काही भागात विधान परिषदेची निवडणूक असल्याचे आदर्श आचारसंहिता आहे. यामुळे संबंधीत जिल्ह्याच्या घटक प्रमुखाने त्याबाबत संबंधीत निवडणूक अधिकाºयांशी संपर्क साधून आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची काळजीपुर्वक दक्षता घ्यावी व संबंधीत नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांना बदली ठिकाणी कार्यमुक्त करावे व तसा अहवाल वरिष्ठांना पाठवावा असे आदेशित केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस