शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बदल्यांमुळे ‘ऑनलाईन शिक्षणात’ बाधा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 5:00 AM

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८१२ शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनपद्धतीने शिक्षण दिले जात आहे.

ठळक मुद्देकोरोनायनात शिक्षकांच्या बदल्या नकोच : शिक्षक संघटनांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होईल, याचा थांगपत्ता नाही. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावे म्हणून ऑनलाईन शिक्षण दिल्या जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. अशा स्थितीत शिक्षकांच्या बदल्याचे धोरण अवलंबिल्याने सध्या विद्यार्थ्यांशी जुळलेल्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ‘ऑनलाईन शिक्षणात’ खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कोरोनाकाळात शिक्षकांच्या बदल्या नकोच, असाच सूर सर्व स्तरातून उमटत आहे.जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८१२ शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनपद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पालकांकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल नाही.या मंदिच्या दिवसात सर्वांनी मोबाईल खरेदी करावे, अशी परिस्थिती नाही. तसेच अनेकांना रिचार्जचा खर्च परवडणारा नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी गावातील काही पालकांचा ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडून ठेवले आहे.बहूतांश ठिकाणी शिक्षकांकडून नियमित अभ्यास घेतला जात आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या झाल्यास, त्या शिक्षकांचा गावातील पालकांशी संपर्क तुटणार आहे. नवीन शिक्षकांची ओळख व्हायला आणि पालकांशी समन्वय जुळायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आपत्तीकाळातील ऑनलाईन शिक्षणाचा बट्टयाबोळ होण्याची शक्यता नाकरता येत नाही.ऑनलाईनचा आदेश ऑफलाईनकरिताशासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील १५ टक्के शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहे. हा आदेश ऑनलाईन बदल्यांसाठी होता. मात्र, तो आता ऑफलाईन बदल्यांसाठी उपयोगात आणल्या जात आहे. या बदल्यांमुळे एकल शिक्षक, सेवा कनिष्ठ व बदली नियमातील सवर्ग ४ च्या शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे. शासनाने बदल्या कराव्यात पण, कोरोना संकटातील गंभीर परिस्थिती आणि शाळाबंद असताना नकोत, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.चार जिल्ह्यातील बदली प्रक्रिया झाली रद्दकोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता लातूर, सांगली, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली तर भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय बदल्या रद्द करुन विनंती बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पण, वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाही शिक्षकांच्या बदल्यांचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.असा आहे बदली कार्यक्रमजिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार २ ऑगस्टला शिक्षकांची जिल्हास्तरीय तात्पुरती यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ३ व ४ ऑगस्टला त्यावर आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. ५ ऑगस्टला आलेल्या आक्षेपावर अधिकाºयांकडून सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम यादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध करुन ८ व ९ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या एकूण संख्येपैकी १५ टक्के शिक्षकांची बदली प्रक्रिया ८ व ९ ऑगस्टला राबविली जाणार आहे. त्याकरिता कार्यक्रमही जाहीर केला असून ही प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम डायट व शासनाकडून सुरु असल्याने शिक्षणात कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वर्धा.जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसारच शिक्षकांचीही बदली प्रक्रिया राबविण्यात येईल. यासंदर्भात शिक्षक संघटनांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. कार्यक्रम जाहीर झाला असला तरी आक्षेप नोंदविण्याची संधी आहेत.- सरिता गाखरे, अध्यक्ष जि. प., वर्धा.