शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

घाटांच्या लिलावाअभावी ट्रॅक्टर व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:44 AM

तालुक्यातील रेतीघाटांचा तसेच इतर गौण खनिजांचा लिलाव करण्यात आला नाही.

तहसीलदारांना निवेदन : ग्राहक पंचायत शाखेने व्यक्त केली चिंता लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : तालुक्यातील रेतीघाटांचा तसेच इतर गौण खनिजांचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी, यावर अवलंबून असलेले व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यामुळे रेतीघाट तथा गौण खनिजांचे लिलाव करून परिसरातील घर बांधकामांना गती देण्यासह यावर अवलंबून असलेल्या रोजगाराला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत ग्राहक पंचायत शाखेद्वारे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील बहुतांश रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. यामुळे यावर आधारित असलेला ट्रॅक्टरचा व्यवसाय अडचणीत आला आहे. एकट्या देवळी शहरात ९७ ट्रॅक्टर असून तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती मिळून या वाहनांचा आकडा मोठा आहे. यावर मजुरीची कामे करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. बहुतेक ट्रॅक्टर व्यवसायी सुशिक्षित बेरोजगार आहेत. लग्नापूर्वी कामधंद्याची विचारणा होत असल्याने बहुतांश सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेचे कर्ज घेऊन ट्रॅक्टरचा व्यवसाय थाटल्याचे दिसून येते; पण रेती घाटांचा लिलाव होत नसल्याने त्यांच्या ट्रॅक्टरची चाके फिरणे बंद झाली आहेत. यातील बहुतांश व्यावसायिक नवविवाहीत असल्याने त्यांचा संसार अडचणीत आला आहे. रेती उपलब्ध होत नसल्याने घरांची बांधकामे ओस पडली आहेत. शासकीय कामेही अडचणीत आली आहेत. अधिकचे पैसे मोजून अवैध मार्गाने आणलेली रेती घ्यावी लागत आहे. यामुळे सामान्यांच्या घर बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रेती व्यवसायाअभावी ट्रॅक्टरचे व्यवसाय बंद पडल्याने मजुरांची कुटुंबेही आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील वर्धा नदीसह इतर लहान -मोठ्या नद्या व नाल्यांवरील रेती घाटांचा लिलाव करून न्यायाची भूमिका घेण्यात यावी, अशी मागणीही तहसीलदार यांच्यामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली. निवेदन देताना ग्राहक पंचायतचे शाखाध्यक्ष विश्वनाथ खोंड, नारायण चव्हाण, शेख जुम्मन, भाऊराव क्षीरसागर, मीनाक्षी शिदोडकर, शेख जुम्मन शेख मुनीर व पदाधिकारी उपस्थित होते.