शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

शेतीच्या वादातून महिन्याभरात दोघांना केले ‘खल्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 14:59 IST

शेतीच्या सातबारावर असलेल्या कुळाच्या नावावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला. एका महिन्याच्या कालावधीत शेतीच्या वादातून दोघाजणांची हत्या करण्यात आली.

ठळक मुद्दे‘मधुकर’ हत्याप्रकरणात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : शेतीच्या वादातून घोराड गावात दोघांना आपला जीव गमवावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आणि २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास दोघांची शेतीच्या वादातून हत्या झाल्याचे समोर आल्याने आता शेतीचा वाद विकोपाला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोहणे आणि तेलरांधे या दोन कुटुंबांत २५ सप्टेंबर रोजी शेतीच्या सातबारावर असलेल्या कुळाच्या नावावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला. यात वसंता पोहाणे याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात तेलरांधे कुटुंबच कारागृहात डांबले गेले. या घटनेला अवघा एक महिना पूर्ण होत नाही तोच एकाच कुटुंबात असणाऱ्या चुलत भावांमध्ये शेतात जाण्याचा रस्त्याच्या वादातून अनेक वेळा वाद झाले. त्यानंतर हा रस्त्याचा वाद तहसीलमध्ये गेला. यात तहसीलदारांनी शेतात जाण्याचा मार्ग मोकळा केला असला तरी जेथून रस्ता दिला त्या रस्त्याची वाट खुली झालीच नाही. यावरून काही वर्षांपासून असलेल्या वादाचे रूपांतर अखेर मधुकरच्या हत्येत झाले. मधुकर चिंतामण खराबे याला रॉडने मारहाण करीत त्याची हत्या करण्यात आली.

अवघ्या महिनाभरात झालेल्या दोन्ही हत्याकांडांमुळे परिसराला हादरा बसला. मधुकरच्या पत्नीलाही जबर मार लागल्याने ती सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणात सुरेश खराबे त्यांची पत्नी, मुलगा ,मुलगी व पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कोहळे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, वरठी, अमोल राऊत करीत आहे.

दोन्ही कुटुंबांतील सदस्य गजाआड

एका महिन्याच्या कालावधीत शेतीच्या वादातून दोघाजणांची हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्याकांडांत दोन्ही कुटुंबांतील सदस्य गजाआड झाल्याने गावात घडत असलेल्या या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त होत आहे; तर शेताचा व घरगुती वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी तक्रारीनंतर लवकरच प्रशासनाने पावले उचलली तर अनुचित प्रकार घडणार नाही, अशी चर्चाही आता गावात होऊ लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी