शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:15 IST

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रभातार्इंचा खरा वारसदार मैदानात । सुभेदारांच्या मनात भरली भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चारूलता टोकस यांचे मावस बंधू असलेले आमदार रणजित कांबळे यांच्यावर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी येऊन पडलेली आहे. प्रभातार्इंनी आपल्या हयातीतच रणजितदादांना राजकीय वारसदार मानले. सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला. आता तार्इंच्या खऱ्या वारसदार राजकारणात प्रवेश करू पाहत आहेत. मात्र, गेल्या पाच- सात दिवसांपासून दादा प्रचारात कुठेही दिसले नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक जण तार्इंना व कार्यकर्त्यांना दादा कुठे? अशीच विचारणा करीत आहे. चारुलता टोकस यांना निवडणूक लढविण्याचा फारसा अनुभव नाही. त्यांच्या आई हयात असताना वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या लढल्या होत्या. त्या ज्या भागातून निवडून आल्या, तो भाग प्रभाताई राव यांचा बालेकिल्ला होता. आता या बालेकिल्ल्यावर प्रभातार्इंचा बहिणलेक आमदार रणजित कांबळे यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. या साम्राज्याला चारूताई निवडून आल्यास सुरूंग लागेल, अशी भीती दादांच्या असंख्य सुभेदारांना आहेत. त्यामुळे हे सुभेदार आपली एकहाती राजवट संपू देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणूनच निवडणुकीच्या ऐन धामधुमीत वर्ध्याचे सद्भावना भवन बंद आहे. यातच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा सारा भाग सामावलेला आहे. सद्भावना भवनाने प्रभातार्इंच्या राजकारणाचे व या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाचे अनेक पैलू पाहिलेले आहे. ते सद्भावना भवन निवडणुकीच्या धामधुमीत बंद असल्याने काँग्रेसचे अनेक जुनेजाणते लोक प्रचार कुठे दिसत नाही, असे म्हणून आल्यापावली परत जात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस