शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

'टंग टाय'नं पोरं बोलतील स्पष्ट ; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत होणार मोफत शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:28 IST

Wardha : जिल्ह्यात दोन बालकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारे जन्मजात असलेले व्यंग, आजार यावर वेळीच उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातात. यातच ज्या मुलांना बोलण्याचा त्रास होतो. अशा बालकांवर 'टंग टाय' शस्त्रक्रिया केली जाते. जिल्ह्यात दोन बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शाळा व अंगणवाडी आरोग्य तपासणीदरम्यान आढळलेल्या बालकांना ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर संदर्भित करण्यात येते. ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. त्यांना वरिष्ठ स्तरावर संदर्भसेवा पुरविण्यात येते. जीभव्यवस्थित हालचाल करू शकत नसल्यामुळे शब्द उच्चारण्यात किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते. सर्जरी केल्यानंतर स्पीच थेरपीने बालकांची बोलण्याची अडचण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक बालकांना दिलासा मिळू शकतो.

शस्त्रक्रीयेसाठी अशी झाली बालकांची निवडज्यां बालकाची जीभ सामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असते, ज्यामुळे जीभपूर्णपणे हालचाल करू शकत नाही. अशा बालकांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड केली जाते. त्यातील दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पूर्णतः मोफत उपचारआरबीएसकेअंतर्गत बालकांवरील उपचार, तसेच गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. बहुतांश शस्त्रक्रिया या खासगी रुग्णालयात केल्या जातात.

उच्चाराची समस्या, ऋषिकेशला 'लुषिकेश'!जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा (फ्रेन्युलम) असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असल्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे उच्चारणातही अडचणी येतात.

शस्त्रक्रिया कुठे?जिल्ह्यात टंगटाय ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी ही शस्त्रक्रीया करण्यात येते.

शून्य ते १८ वयोगटातील मुलांची तपासणीराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी करून मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याकरिता अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयात तपासणी मोहीम राबविण्यात येते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देशराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात व्यंग, लहान मुलांमधील आजार असणाऱ्यांना वेळीच उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. 

टंग टाय म्हणजे काय?जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असणे, ज्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे बोलण्यावरही परिणाम होऊ शकतो.

"० ते १८ वयोगटातील बालकांच्या गंभीर आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाते. जिल्ह्यात टंगटाय शस्त्रक्रियेसाठी बालकांची निवड करण्यात आली असून, दोन बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे."-डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धाHealthआरोग्य