शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'टंग टाय'नं पोरं बोलतील स्पष्ट ; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत होणार मोफत शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:28 IST

Wardha : जिल्ह्यात दोन बालकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारे जन्मजात असलेले व्यंग, आजार यावर वेळीच उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातात. यातच ज्या मुलांना बोलण्याचा त्रास होतो. अशा बालकांवर 'टंग टाय' शस्त्रक्रिया केली जाते. जिल्ह्यात दोन बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शाळा व अंगणवाडी आरोग्य तपासणीदरम्यान आढळलेल्या बालकांना ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर संदर्भित करण्यात येते. ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. त्यांना वरिष्ठ स्तरावर संदर्भसेवा पुरविण्यात येते. जीभव्यवस्थित हालचाल करू शकत नसल्यामुळे शब्द उच्चारण्यात किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते. सर्जरी केल्यानंतर स्पीच थेरपीने बालकांची बोलण्याची अडचण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक बालकांना दिलासा मिळू शकतो.

शस्त्रक्रीयेसाठी अशी झाली बालकांची निवडज्यां बालकाची जीभ सामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असते, ज्यामुळे जीभपूर्णपणे हालचाल करू शकत नाही. अशा बालकांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड केली जाते. त्यातील दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पूर्णतः मोफत उपचारआरबीएसकेअंतर्गत बालकांवरील उपचार, तसेच गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. बहुतांश शस्त्रक्रिया या खासगी रुग्णालयात केल्या जातात.

उच्चाराची समस्या, ऋषिकेशला 'लुषिकेश'!जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा (फ्रेन्युलम) असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असल्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे उच्चारणातही अडचणी येतात.

शस्त्रक्रिया कुठे?जिल्ह्यात टंगटाय ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी ही शस्त्रक्रीया करण्यात येते.

शून्य ते १८ वयोगटातील मुलांची तपासणीराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी करून मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याकरिता अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयात तपासणी मोहीम राबविण्यात येते.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देशराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात व्यंग, लहान मुलांमधील आजार असणाऱ्यांना वेळीच उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. 

टंग टाय म्हणजे काय?जिभेच्या खालील भागाच्या तोंडाच्या तळाशी जोडणाऱ्या ऊतीचा पट्टा असामान्यपणे लहान, जाड किंवा घट्ट असणे, ज्यामुळे जीभ पूर्णपणे हालचाल करू शकत नाही. त्यामुळे बोलण्यावरही परिणाम होऊ शकतो.

"० ते १८ वयोगटातील बालकांच्या गंभीर आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाते. जिल्ह्यात टंगटाय शस्त्रक्रियेसाठी बालकांची निवड करण्यात आली असून, दोन बालकांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे."-डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धाHealthआरोग्य