लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उभारून वाहनचालकांकडून टोलच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. रस्त्याचे संपूर्ण काम झाल्यावरच टोल घ्यावा, अशी वाहनचालकांची मागणी आहे.बुटीबोरी-वर्धा या मार्गाची झालेली दैनावस्था पाहून या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या माध्यमातून या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम काही अपवाद वगळता युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीत सेलडोह परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु, तेथून काही अंतरावर असलेल्या हळदगाव येथे टोल नाका उभारून मनमर्जीने टोलवसुली केली जात आहे. या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना एकेरी प्रवासाची पावती दिली जात आहे. केवळ एकेरी प्रवासाची पावती का देता अप-डाऊनची द्या, अशी विचारणा वाहनचालकांकडून केली असता एनएचआयने बंदी घातली असल्याचे कारण टोल नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत भर पडली आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.व्यवस्थापकाचा भ्रमणध्वनी देण्यास नाया प्रकरणी हळदगाव येथील टोल नाका प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी टोलवर कार्यरत कर्मचाºयांना टोलच्या व्यवस्थापकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची विचारणा केली असता क्रमांक देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे टोलनाका प्रशासनाची बाजू जाणून घेता आली नाही.
उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST
वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उभारून वाहनचालकांकडून टोलच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत.
उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वीच टोलवसुली
ठळक मुद्देहळदगाव टोल नाक्यावर मनमर्जी, एकल प्रवासाची पावती