शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

मालमत्ता, पाणीकरापोटी १ कोटी ९० लाख थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:11 IST

शासनाच्या सोयीसुविधा घेतल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता व पाणीपट्टीकराचा भरणा ग्रामपंचायतींना करावा लागतो. मात्र, यामध्ये राजकारण आडवे येत असल्याने एकट्या आष्टी तालुक्यात १ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन शासनाला महसूल प्राप्त करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे५२ गावांतील स्थिती : प्रशासनाकडून वसुलीस चालढकल

अमोल सोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शासनाच्या सोयीसुविधा घेतल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता व पाणीपट्टीकराचा भरणा ग्रामपंचायतींना करावा लागतो. मात्र, यामध्ये राजकारण आडवे येत असल्याने एकट्या आष्टी तालुक्यात १ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन शासनाला महसूल प्राप्त करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.२०१६-१७ या वर्षापासून सुरू २०१८-१९ पर्यंत साधारणत: ६४ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. दिवसेंदिवस वसुलीला जास्त त्रास होताना पाहावयास मिळत आहे. ग्रामसेवक वसुलीसाठी गेल्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य नंतर वसुली घेजा, आता काही रक्कम द्या, पुढील वर्षात भराल अशा प्रकारची भूमिका घेऊन संबंध जोपासतात. यात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. १४ वा वित्त आयोगाने ग्रामपंचायतीला त्रस्त केले आहे. निधी कमी आणि भानगडी जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला बाधा पोहचत आहे.आष्टी, साहूर, तळेगाव, लहान आर्वी या चारही सर्कलमधील ५२ गावांतील वसुली सध्यातरी ६१ टक्केच पूर्ण झाली आहे. ३९ टक्के वसुलीसाठी पंचायत समिती प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ग्रामपंचायतीला वसुलीसाठी तंबी देण्याची मागणी होत आहे. घराच्या करामध्ये ग्रा.पं. हद्दीमधील जागेवर केलेले मालकी हक्काचे बांधकाम, स्वत:चे घर, सामान्य पाणीपट्टी, दिवाबत्ती, पाणीपुरवठा या कराची वसुली प्राधान्याने करावी लागते. वसुली कराच्या वेळी राजकारण आडवे येत असल्याने ग्रामसेवक त्रस्त झाले आहे. झालेल्या वसुलीमधून गावाच्या पाणीपुरवठ्याचे व दिवाबत्तीचे वीजबिल, लाईट व ब्लिचिंग पावडर खरेदी करावी लागते. तालुक्यात २० ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न अत्यंत कमी असल्याने गावाचा कारभार हाकणे अवघड झाले आहे. उसनवारीने जुळवाजुळव करून बिल भरून सार्वजनिक दिवाबत्ती व पाणी सुरळीत ठेवावी लागते.शासनाने या सर्व बाबींचा विचार करून १४ वा वित्त आयोगाचा निधी लोकसंख्या नियम न लावता सरसकट देण्याची गरज आहे. तरच घराची व पाणीपट्टी कराची रक्कम कमी आली तेव्हा विकासाच्या बाबींवर परिणाम होणार नाही. सध्या १४ वित्त आयोगाच्या निधीमधून औषध खरेदी, शाळांना विविध वस्तूंची खरेदी, रंगकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडी यांनाही निधी द्यावा लागत असल्याने तुटपुंज्या निधीमधून सर्वांना न्याय देणे शक्य नाही. ग्रामसेवकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.सध्या १ कोटी ९० लाख रुपयाच्या वसुलीसाठी ग्रामसेवकांचे प्रयत्न सुरू आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शासनाने घर व पाणीपट्टी कर माफ करावा, अशी मागणी आष्टी तालुक्यातील नागरिकांनी शासनाकडे केली आहे.पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपलोकप्रतिनिधींचे मतराजकारणामुळे गावात संबंध असतात. त्यामुळे मालमत्ता व पाणीकरातून अनेकांना वारंवार सवलत दिली जाते. यात कित्येक जण पाच-पाच वर्षे कुठल्याही कराचा भरणा करीत नसल्याने थकबाकी वाढतच जाते. ग्रामसेवक प्रशासकीय व्यक्ती असली तरी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या भूमिकेमुळे कठोर भूमिका घेता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे प्रशासनाचे नुकसान होत असून थकबाकीचा आकडा कोटीवर जात असल्याचे दिसून येते.तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये थकीत मालमत्ता व पाणीपट्टीकर वसुलीसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे संबंधित ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहे. गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने कर भरावा.- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (शहीद).

टॅग्स :Taxकर