शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मदन उन्नई भागविणार वर्धेकरांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:07 IST

वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून पाहणी : धाम नदीत पाणी सोडण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.वर्धा शहर व शहरालगतच्या अकरा गावांना धाम नदीतूनच पाणी पुरवठा केल्या जातो. यावर्षी समाधानकारक पाऊन पडला नसल्यामुळे धाम नदीने तळ गाठले आहे. तसेच धाम नदीचे काचनूर, कासारखेडा भागात खोलीकरण केल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी नदीतील जलसाठा संपल्याने शहरासह अकरा गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. शहराला सध्या तीन दिवसाआड तर कधी चार दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच सहन कराव्या लागत आहे. पाणी प्रश्न पेटण्यापूर्वी यावर तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु केल्या आहे. गुरुवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी धाम नदीत कुठे पाणी सोडता येऊ शकते, त्या स्थळांची पाहणी केली. मदन उन्नई धरणातील पाणी उजव्या कालव्यात सोडणार असून येळाकेळी येथील कालव्यातून ते पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाली मार्गे नदीत सोडण्यात येणार आहे. त्याकरिता नाली साफसफाईच्या कामाला गती देणार असून येत्या काही दिवसांत धाम नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या माहितीला कनिष्ठ अभियंता लोखंडे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता वर्धेकरांसह परिसरातील नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे.पुलाच्या बांधकामामुळे पाणी सोडणे अशक्यखरांगणा ते मासोद मार्गावरील धाम नदीचा पूल खचल्याने पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे महाकाळी धरणातून पाणी सोडणे शक्य होत नसल्याने मदन उन्नई धरणाचा पर्याय निवडला आहे.मदन उन्नई धरण यावर्षी कोरडेच होते. पण मदना धरणातून पाणी सोडल्याने जलसाठा वाढला. पॉवर कंपनी सुध्दा मोठ्या प्रमाणात मयार्देपेक्षा जास्त पाणी उपसा करीत असून मदना धरणाचा जलसाठा किती महिने टिकेल, हे येणारा काळच सांगेल.खंड पडणार पण पाणी मिळणार : जिल्हाधिकारीपावसाने पाठ फिरविल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.परंतू नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. पावसाळा लागण्यापूर्वी पाणी मिळावी अशी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा करण्यात थोडा खंड पडेल पण सर्वांनाच पाणी मिळेल,असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण