शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

मदन उन्नई भागविणार वर्धेकरांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:07 IST

वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून पाहणी : धाम नदीत पाणी सोडण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.वर्धा शहर व शहरालगतच्या अकरा गावांना धाम नदीतूनच पाणी पुरवठा केल्या जातो. यावर्षी समाधानकारक पाऊन पडला नसल्यामुळे धाम नदीने तळ गाठले आहे. तसेच धाम नदीचे काचनूर, कासारखेडा भागात खोलीकरण केल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी नदीतील जलसाठा संपल्याने शहरासह अकरा गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. शहराला सध्या तीन दिवसाआड तर कधी चार दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच सहन कराव्या लागत आहे. पाणी प्रश्न पेटण्यापूर्वी यावर तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु केल्या आहे. गुरुवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी धाम नदीत कुठे पाणी सोडता येऊ शकते, त्या स्थळांची पाहणी केली. मदन उन्नई धरणातील पाणी उजव्या कालव्यात सोडणार असून येळाकेळी येथील कालव्यातून ते पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाली मार्गे नदीत सोडण्यात येणार आहे. त्याकरिता नाली साफसफाईच्या कामाला गती देणार असून येत्या काही दिवसांत धाम नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या माहितीला कनिष्ठ अभियंता लोखंडे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता वर्धेकरांसह परिसरातील नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे.पुलाच्या बांधकामामुळे पाणी सोडणे अशक्यखरांगणा ते मासोद मार्गावरील धाम नदीचा पूल खचल्याने पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे महाकाळी धरणातून पाणी सोडणे शक्य होत नसल्याने मदन उन्नई धरणाचा पर्याय निवडला आहे.मदन उन्नई धरण यावर्षी कोरडेच होते. पण मदना धरणातून पाणी सोडल्याने जलसाठा वाढला. पॉवर कंपनी सुध्दा मोठ्या प्रमाणात मयार्देपेक्षा जास्त पाणी उपसा करीत असून मदना धरणाचा जलसाठा किती महिने टिकेल, हे येणारा काळच सांगेल.खंड पडणार पण पाणी मिळणार : जिल्हाधिकारीपावसाने पाठ फिरविल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.परंतू नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. पावसाळा लागण्यापूर्वी पाणी मिळावी अशी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा करण्यात थोडा खंड पडेल पण सर्वांनाच पाणी मिळेल,असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण