शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

तीन वर्षांत ३.२ लाख वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:34 PM

वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देदोन महामार्गांसाठी १८ हजार झाडांवर चालली कुऱ्हाड : वर्धेकरांना भोगावे लागताहेत परिणाम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्धा जिल्ह्यातून जात असलेल्या दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार वृक्ष तोडण्यात आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे याचा विपरीत परिणाम जिल्ह्याच्या वातावरणावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्याची गरज आहे.मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. कधी नव्हे, एवढ्या भीषण जलसंकटाला वर्धेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात तोंड द्यावे लागले. तर पावसाळा सुरू होऊन एक महिना २२ दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यात नाममात्रच पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीसह विविध जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हे महत्त्वाचेच आहेत. परिणामी, प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे सांगण्यात येते. परंतु, गत तीन वर्षांत तब्बल ३.२ लाख डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याने याचा विपरीत परिणामच महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यावर होत आहेत. भविष्यातील संकट लक्षात घेत वृक्षारोपण आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे लावण्यात आलेली रोपटी जगविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आज गरजेचे आहे.५१.३ लाख रोपटे लावल्याचा केला जातोय गाजावाजा२ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात ७.६५ लाख, ४ कोटी वृक्षलागवड अंतर्गत १२.३८ लाख तर मागीलवर्षी ३१ लाख रोपटे वर्धा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लावण्यात आल्याचे आणि या झाडांपैकी ८५ टक्के रोपटे सध्या जिवंत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी प्रत्यक्षात किती रोपटे उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि उन्हाचा मारा सहन केल्यानंतर सध्या जिवंत आहेत, हा खरा संशोधनाचा विषय ठरत आहे.वृक्ष हे पाणी अडविणे आणि जिरविण्याचे महत्त्वाचे काम करते. मनुष्याला शुद्ध प्राणवायू देते. परंतु, मागील अनेक वर्षांपासून वृक्षतोड होत आहे. सध्या वृक्षारोपणाला महत्त्व दिले जात असले तरी प्रत्यक्षात वृक्षसंवर्धनासाठी भरीव कार्य होणे ही काळाची गरज आहे. लावण्यात आलेल्या रोपट्यांचे कमीत कमी दहा वर्ष संगोपन झाले पाहिजे. शिवाय, शासनानेही वृक्षारोपणासह वृक्षांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली पाहिजे.- मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा.वर्धा जिल्ह्यातून दोन मोठे महामार्ग जात आहेत. विदर्भाच्या विकासासाठी हे महामार्ग आवश्यक आहेत. विकासाला विरोध नाही. परंतु, याच दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर उघडकीस आली आहे. विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड कशी थांबविता येईल, यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे.- ताराचंद चौबे, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.