शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

तीन हजार वर्षांचा इतिहास शिळावर्तुळाखाली दफन; संशोधनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:17 IST

संशोधनाची गरज : खैरवाडा पर्यटन केंद्राची २० वर्षांपासून मागणी, पूर्तता कधी?

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. या काळाला लोह-बृहदाश्मयुग हे नाव संबोधले जाते. या संस्कृतीचे विपुल पुरावे नजीकच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील खैरवाडा गावात आढळून आले आहे. येथे आढळून येणारे शिळावर्तुळ हे हजारो वर्षापूर्वीचे असल्याने या ठिकाणी खैरवाडा पर्यटन केंद्राची मागणी सातत्याने केली. मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

खैरवाडा गावचे संशोधन सर्वप्रथम १८८१ मध्ये डॉ. जे कॅरन यांनी केले. १९८१ साली डेक्कन कॉलेज पुणेच्या पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी सर्वेक्षण केले होते. त्यात पंधराशे शिलावर्तुळे आढळून आली होती. ही शिळावर्तुळे लोहबृदाश्मयुगातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या संस्कृतीचा काळ इ.स.पू. १००० पासून इ.स.पू. ७००-८०० पर्यंतचा असून, कर्नाटकातील कुमरणहळळी येथे इ.स.पू. १३०० मध्ये या संस्कृतीची सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. 

या संस्कृतीची दफनाची एक विशिष्ट पद्धत होती. यात साधारणपणे तीन प्रकारचे दफन करण्यात येत होते. संपूर्ण शरीराचे दफन, अग्निसंस्कारानंतर हाडे संग्रहित करून त्यांचे दफन, पारशी लोकांच्या पद्धतीसारखे पशूनी खाल्ल्यावर अस्थिसांगाड्याचे दफन. दफनाकरिता साधारणपणे एक खड्डा खणून त्यात शव किंवा सांगाडा किंवा अस्थिअवशेष व त्याने वापरलेल्या वस्तू, नंतरच्या जीवनात उपयोगी पडू शकणाऱ्या वस्तू व मृताच्या प्रिय वस्तू यांचे दफन करून खड्डा मातीने बुजवून त्याच्या सभोवती वर्तुळाकार मोठमोठे दगड ठेवण्यात येत असत. खैरवाडा परिसरात आजही ही शिलावर्तुळे सुस्थितीत असून, काही शेतीमुळे सपाट करण्यात आली आहेत. 

शिलावर्तुळाचे विविध आकार उपलब्ध शिलावर्तुळाचे मोजमाप केले असता शिलावर्तुळाचा व्यास ३० फूट, ४० फूट, व ५० फूट आढळून आला. ही १० फुटांच्या प्रमाणात असलेली शिलावर्तुळे वैशिष्ट्यपूर्णच आहे. उंची ३ ते ५ फूट उंच आहे. शिलावर्तुळाचा व्यास याच्या संबंधाच्या संशोधनाची गरज आहे. प्रत्येक शिलावर्तुळात ४० पाषाण खंड आहेत. वनखात्याच्या जमिनीवरील शिलावर्तुळे आजही सुस्थितीत आहेत. काही पाषाण खंड ५-६ फूट उंचीचे असून, काही पंचकोन व षटकोणी स्तंभाच्या आकाराचे आहेत.

पर्यटन केंद्रासाठी आमदारांकडे साकडे तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले खैरवाडा (ता. कारंजा) गावाला पर्यटन केंद्र म्हणून घोषित करावे. या ठिकाणी पुरातत्त्व संग्रहालय स्थापन करण्यात यावी अशी मागणी विदर्भ पर्यटन व पर्यावरण संस्था रोहणाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून शासनाकडे केल्या जात आहे. मात्र, अद्याप याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे याचा पाठपुरावा करून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ही मागणी मान्य करून घ्यावी यासाठी आमदार सुमित वानखडे यांना साकडे घालण्यात आले.

टॅग्स :wardha-acवर्धा