शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कोविड निर्मुलनासाठी ‘थ्री-टी’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणीवर भर : आरोग्य विभागाने कसली कंबर, मृत्यू टाळण्यासाठी होताय प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसुत्री संकल्पनेवर भर देऊन जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत. कोरोना काळातील पुढील धोका लक्षात घेऊन शोध, निदान आणि उपचार याला प्राधान्यक्रम दिल्या जात असल्याने लवकरच वर्धा जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुळे पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत असल्याचे वास्तव आहे. कोविड बाधित वेळीच बरे होण्यासाठी थ्री टी ही संकल्पना सध्या उपयुक्त ठरत आहे.१६० व्यक्तींची कोरोनावर मातजिल्ह्यातील २१९ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरील तसेच वर्धा जिल्ह्यातील १६० कोविड बाधितांना वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्याने त्यांनी कोरोनावर मात केल्याचे वास्तव आहे. तर सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तींने कोरोनावर विजय मिळविल्यानंतर त्याचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.रविवारी सात रुग्ण रविवारी आढळले सात नवीन रुग्णवर्धा : रविवारी २१२ व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये दोन देवळी तालुक्यातील तर पाच वर्धा तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.थ्री टी संकल्पनेला शंभर पैकी शंभरच गुण देऊथ्री ‘टी’ संकल्पना खरोखर उपयुक्त आहे काय याबाबत अधिक माहिती कोरोनामुक्त झालेल्या आर्वीतील एका व्यक्तीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जाणून घेतली असता, ट्रेस (शोध), टेस्ट (निदान) आणि ट्रीट (उपचार) ही संकल्पना खरोखर उपयुक्त आहे. या संकल्पनेला आपण शंभरपैकी शंभर गुण देतो. शिवाय मला आरोग्य सेवाही चांगली मिळाल्याने मी कोरोनावर मात करू शकलो. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मी गृहविलगीकरणात असून लवकरच यातून माझी मुक्तता होणार असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले.विलगीकरणाचे नियम ठरते उपयुक्तकोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला १४ विलगीकरणात ठेवले जात आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्यांना सुरूवातीला सात दिवस संस्थात्मक तसेच नंतरचे सात दिवस गृहविलगीकरणात ठेवले जात असल्याने कोविडचा स्प्रेड टाळण्यासाठी मदत होत आहे. एकूणच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेले विलगीकरणाचे नियम सध्या उपयुक्तच ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या