शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाईप चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे,  आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथील रेल्वेस्थानक परिसरात टाकण्यात आलेली बीडची जलवाहिनी फोडून चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सापळा रचून तीन अट्टल चोरट्यांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाईपलाईनचे साहित्य जप्त केले. धाम नदीपात्रातून सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरापर्यंत मध्य रेल्वेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र, काहींकडून ही पाईपलाईन फोडून चोरुन नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार आरपीएफचे निरीक्षक विजयमुकार त्रिपाठी, उपनिरीक्षक के.एन. राय यांच्या नेतृत्वात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रभारी आरक्षक रमाकांत चौधरी, तडवी, डी.बी.शिंदे,  आरक्षक मुश्ताक यांनी घेराव घालून तिघांना अटक केली. ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक आशुतोष पांडेय यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

३ दिवसांची आरपीएफ कोठडी...आरोपी चोरट्यांविरुद्ध सेवाग्राम आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करुन वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त व सह सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही तीन दिवसांची आरपीएफ कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचीही माहिती जाणून घेतली जात आहे.

२०० किलोचे साहित्य पोलिसांनी केले हस्तगत तीन चोरटे पाईप फोडत असल्याचे दिसून आले. तसेच ते साहित्य पोत्यांत भरुन घेऊन जात होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी रेल्वेची संपत्ती चोरल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक राय, रमाकांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ पोत्यांतील ८ हजार रुपये किमतीचे २०० किलो साहित्य हस्तगत केले. आरोपींनी यापूर्वीही इतर दोन आरोपींसह पाईप फोडून चोरुन नेत वर्ध्यातील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याची माहिती दिली.

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर