शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गचाळ कार्यप्रणालीमुळे हजारो क्विंटल तूर बेवारस

By admin | Updated: May 13, 2017 01:15 IST

शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली.

अवकाळी पावसाने केली व्यवस्थेची पोलखोल लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. त्यातही शासकीय यंत्रणेच्या ‘नव दिन मे ढाई कोस’ या म्हणी प्रमाणे कासवगतीनेच तुरीची खरेदी करण्यात आली. २४२७.९७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असताना गुरूवारी दुपारी ४ वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेकडो क्विंटल तूर भिजल्याचे समजते. परंतु, बाजार समितीकडून घटनेला दुजोरा दिल्या जात नव्हता. तुरीची संथगतीने होणारी खरेदी पाहून शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला. त्यानंतर नाफेडनेही २२ एप्रिलपासून खरेदी बंद केली. ११ मेपर्यंत स्थानिय कृउबात एकूण २४२७.९७ क्विंटल तूरीच खरेदी करण्यात आली. ही तूर मार्केट मध्येच पडलेली असतानाच गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुसळदार पाऊस झाला. यात शेकडो क्विंटल तुरी भिजल्याचे समजते. परंतु बाजार समितीद्वारे या घटनेला दुजोरा मिळू शकला नाही. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर राज्य शासनाने बाजार समितीच्या माध्यमातून ३ मे २०१७ पासून तूर खरेदी सुरू केली आहे. ११ मेपर्यंत २४२७.९७ क्विंटल तूर खरेदी केल्याचे कृउबाचे सचिव राजपूत यांनी सांगितले. खरेदी केलेली तूर बाजार समितीचे यार्डामध्ये पडून असून गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे यार्डात पाणी साचले. तुरीच्या पोत्याखालून पाणी गेल्याने खालील भागातील तूर ओली होणे स्वाभाविक आहे. बहुतांश तुरीचे पोते ताडपत्रीने झाकले असले तरी शेकडो क्विंटल तूर भिजल्याचा अंदाज आहे. या संदर्भात कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजपूत यांनी सांगितले की, तुरीचे ढीग नसून ही तूर पोत्यामध्ये भरली आहे. या पोत्यावर मोठमोठ्या ताडपत्र्या झाकल्याने पावसामुळे तूर ओली होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मागणी नाफेडतर्फे २२ एप्रिल पासून तूर खरेदी बंद केली. मार्केट यार्डमध्ये व शेतकऱ्यांकडे अजुनही बरीच तूर पडुन आहे. नाफेडची खरेदी बंद होताच नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना माल द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना १००० ते १२०० रूपयाचे नुकसान सहन करावे लागत असल्याने तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल कृउबाच्या यार्डमध्ये खरेदी करावा अशी मागणी भाजपाचे मंगेश झाडे, राजकुमार पनपालीया, कपील शुक्ला यांनी सभापती खडसेंकडे केली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे -देशमुख मुख्यमंत्र्यांनी तुर खरेदीत मुदत वाढ देण्याचे जाहीर केले होते;पण शहानिशा केली असता अद्यापही कुठलाही आदेश संबंधीतांना प्राप्त नाही. आश्वासन पाळण्याची मागणी वर्धा कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी केली.