शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 14:27 IST

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे.

ठळक मुद्देवर्धा तालुक्यावर केले जाणार लक्ष केंद्रित एसडीएमसह एसडीपीओ उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. याच संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी बेशिस्तांना काठीचा प्रसादही मिळणार आहे. ३६ तासांच्या संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे. वर्धा शहर व शहराशेजारील १३ गावांमध्ये संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका तसेच राजस्व विभागाची एकूण १२ पथके सज्ज करण्यात आली आहेत. याच पथकांतील अधिकारी व कर्मचारी बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपविभागीय न्यायदंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत.

प्रमुख चौकांत केली जाणार नाकेबंदी

संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे. पण, मागील रविवारी अनेक व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवार, २८ फेब्रुवारी रोजी कुणी व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी वर्धा शहरातील प्रमुख चौकांत पोलिसांकडून नाकेबंदी केली जाणार आहे.

२० व्यक्तींच्या उपस्थितीतच करता येणार लग्नसोहळा

रविवार, २८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने काहींनी मंगल कार्यालये आरक्षित केली आहेत. असे असले तरी रविवारी जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू राहणार असल्याने या काळात केवळ २० व्यक्तींच्या उपस्थितीतच नागरिकांना लग्नसोहळे आटोपते घ्यावे लागणार आहेत.

विशेष पथकाचा राहणाच वॉच

संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे प्रत्येक मंगल कार्यालयात पालन केले जात आहे ना? याची शहानिशा करण्यासाठी मंडळ अधिकारी झामरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी रविवारी वर्धा शहर आणि शहराशेजारील ग्रा.पं.च्या हद्दीत असलेल्या प्रत्येक मंगल कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शिवाय बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

परीक्षार्थ्यांनी ओळखपत्र ठेवावे सोबत

रविवार, २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाची परीक्षा आहे. या परीक्षार्थ्यांना संचारबंदीच्या काळात परीक्षा देण्यासाठी जाता येणार असले तरी प्रत्येक परीक्षार्थ्याने आपले ओखळपत्र सोबत ठेवणे क्रमप्राप्त आहे.

सक्तीच्या संचारबंदीच्या काळात वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस