शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची कसून तपासणी सुरू; दर्जावरच टिकेल मान्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:18 IST

बोगसपणा आढळल्यास कारवाई : सेतू केंद्राची मान्यताही होऊ शकते रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपले सरकार सेवा केंद्राच्या गुणवत्तेचे मूल्यमापन जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या संनियंत्रणात सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे केंद्रचालकांना आपली सेवा सुधारावी लागेल अन्यथा केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते.

'आपले सरकार' सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना प्रमाणपत्र, उतारे व इतर सेवा सशुल्क पुरविल्या जातात. या सेवा देताना अनेकदा काही केंद्रांवरून नागरिकांकडून अधिकचे पैसे घेतले जातात, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होतात. ही बाब टाळण्यासाठी राज्यभरातच आपले सरकार सेवा केंद्रांच्या कामाचे व व्यवस्थापनाचे मूल्यमापन होणार आहे.

केंद्राच्या सर्वाधिक तक्रारी कोणत्या ?प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाते, असा आरोप केला जातो. आर्थिक लूट होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी दिसून येतात. याशिवाय मंजूर ठिकाणी केंद्र चालविले जात नसल्याच्याही तक्रारी आहेत.

कसे होणार मूल्यमापन ?आपले सरकार सेवा केंद्रात नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे, मंजुरीच्याच ठिकाणी केंद्र चालविले जात आहे का?, ज्याच्या नावे मंजूर आहे तीच व्यक्ती केंद्र चालवित आहे का? दर्शनीभागात केंद्राचे फलक आहे का?, दिल्या जाणाऱ्या सेवांचे दरफलक, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी सोय आहे काय? आदी गोष्टींचा विचार मूल्यमापनात केला जाणार आहे. 

आपले सरकार केंद्रात सुविधा कोणत्या ?

  • 'आपले सरकार' केंद्रात विविध सरकारी सेवा ऑनलाइन मिळतात. यात जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जमिनीचे उतारे (७/१२, नमुना - ८ उतारा) आणि इतर शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याची सोय आहे.
  • जिल्ह्यात सेतू केंद्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे अवैध प्रकारे चालविल्या जाणार केंद्रांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

तालुकानिहाय आपले सेवा केंद्रतालुका       सेवा केंद्रआर्वी              ९८आष्टी              ६८देवळी            १२१हिंगणघाट       १४५कारंजा            ६५समुद्रपूर          १०४सेलू                ११४वर्धा                १९२

"आपले सरकार सेवा केंद्रांच्या पडताळणीचे काम सुरू झालेले आहे. काही दिवसांतच केंद्रांवरील कार्यवाहीबाबतची माहिती उपलब्ध होईल. केंद्राचे बोर्ड असणे आवश्यक आहे, तसेच नवीन दर असलेली सेवा यादी, नागरिकांना बसायला जागा व पिण्याचे शुद्ध पाणी असणे आवश्यक आहे."- प्रतिक उमाटे, जिल्हा व्यवस्थापक.

टॅग्स :wardha-acवर्धा